शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

जगात ज्ञानाची मक्तेदारी भारताचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST

शिरटे : जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त सकारात्मक विचार जोपासणे आवश्यक आहे. नासासह जगातील अनेक देशांत भारतातील युवक ...

शिरटे : जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त सकारात्मक विचार जोपासणे आवश्यक आहे. नासासह जगातील अनेक देशांत भारतातील युवक संशोधन कार्यात अग्रस्थानी आहेत. त्यामुळे जगाच्या ज्ञानदानात भारताचीच मक्तेदारी आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नसल्याचे मत इस्लामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी व्यक्त केले.

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘आजची तरुणाई आणि पोलिसांची भूमिका’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाजीराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

पिंगळे म्हणाले, धावपळीच्या युगात पैशाच्या मागे लागल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन संवाद कमी झाला आहे. नकारात्मकता वाढत असून सकारात्मक विचार जोपासणे गरजेचे आहे. उगवत्याला नमस्कार करताना मावळत्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी तरुणांपुढे आदर्श व्यक्तींची चरित्रे ठेवली पाहिजेत.

यावेळी रमेश पाटील, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ सावंत, अशोक गोडसे, नीता पाटील, जयश्री पवार, मंडळाचे अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्षा वनीता मोहिते उपस्थित होत्या.

प्रास्ताविक प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी केले. मकरंद राजहंस यांनी स्वागत केले. स्वाती मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती मेहता यांनी आभार मानले.

चौकट

सोशल मीडिया ठरला माणुसकीचा झरा

मार्च महिन्यात कोरोनाने गोरगरिबांचे अत्यंत हाल झाले. एकवेळचे जेवण मिळणे मुश्किल होते. त्यावेळी सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ६७ दिवस १५०० लोकांना दोन वेळचे जेवण दिले. २००० शालेय मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. यासाठी सर्व स्तरातून ९२ लाख रुपये जमा झाले. त्यामुळे संकटकाळात सोशल मीडिया हा माणुसकीचा झरा बनल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

फोटो : ११०२२०२१-आयएसएलएम-कृष्णात पिंगळे