शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

जगात ज्ञानाची मक्तेदारी भारताचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:24 IST

शिरटे : जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त सकारात्मक विचार जोपासणे आवश्यक आहे. नासासह जगातील अनेक देशांत भारतातील युवक ...

शिरटे : जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त सकारात्मक विचार जोपासणे आवश्यक आहे. नासासह जगातील अनेक देशांत भारतातील युवक संशोधन कार्यात अग्रस्थानी आहेत. त्यामुळे जगाच्या ज्ञानदानात भारताचीच मक्तेदारी आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नसल्याचे मत इस्लामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी व्यक्त केले.

भवानीनगर (ता. वाळवा) येथे जागृती साहित्य संस्कार मंडळाच्यावतीने आयोजित कवयित्री शैला सायनाकर स्मृती व्याख्यानमालेत ‘आजची तरुणाई आणि पोलिसांची भूमिका’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाजीराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

पिंगळे म्हणाले, धावपळीच्या युगात पैशाच्या मागे लागल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊन संवाद कमी झाला आहे. नकारात्मकता वाढत असून सकारात्मक विचार जोपासणे गरजेचे आहे. उगवत्याला नमस्कार करताना मावळत्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी तरुणांपुढे आदर्श व्यक्तींची चरित्रे ठेवली पाहिजेत.

यावेळी रमेश पाटील, बाळासाहेब पाटील, हरिभाऊ सावंत, अशोक गोडसे, नीता पाटील, जयश्री पवार, मंडळाचे अध्यक्ष सुहास सावंत, उपाध्यक्षा वनीता मोहिते उपस्थित होत्या.

प्रास्ताविक प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी केले. मकरंद राजहंस यांनी स्वागत केले. स्वाती मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती मेहता यांनी आभार मानले.

चौकट

सोशल मीडिया ठरला माणुसकीचा झरा

मार्च महिन्यात कोरोनाने गोरगरिबांचे अत्यंत हाल झाले. एकवेळचे जेवण मिळणे मुश्किल होते. त्यावेळी सोशल मीडियातून केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ६७ दिवस १५०० लोकांना दोन वेळचे जेवण दिले. २००० शालेय मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. यासाठी सर्व स्तरातून ९२ लाख रुपये जमा झाले. त्यामुळे संकटकाळात सोशल मीडिया हा माणुसकीचा झरा बनल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

फोटो : ११०२२०२१-आयएसएलएम-कृष्णात पिंगळे