शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये अवकाळीचा डाळिंबांना फटका

By admin | Updated: December 14, 2014 23:50 IST

चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप : शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित

दरीबडची : जत तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये अवकाळीने तडाखा दिल्याने द्राक्ष, डाळिंबबागांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये बहरात आलेले डाळिंब पीक एका रात्रीत फुटून गेले. ७५ टक्क्यावर बागा तेल्याने (बिब्ब्या) गेल्या असताना, कृषी विभागाने चुकीचे आणि वस्तुस्थिती न पाहता पंचनामे करून द्राक्षे व डाळिंब बागांचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान क्षेत्र दाखविले आहे. नैसर्गिक संकटाबरोबर मानवनिर्मित चुकीच्या पंचनाम्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. द्राक्षे व डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाले. दीड-दोन महिन्यात सलग दोन, तीनवेळा ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे डाळिंबावर तेल्या, तर द्राक्षावर दावण्याचा प्रादुर्भाव झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागा बहरात आलेली डाळिंबं एका रात्रीत फुटून गेली.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ९ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दुष्काळात पिचलेला आणि कर्जे काढलेला शेतकरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाने आर्थिक संकटात आला आहे. ज्या बागा फुलोऱ्यात (फ्लॉवरिंग स्टेज) होत्या, त्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ते ६० टक्के द्राक्षघडांची गळ झाली आहे. दावण्याचा प्रादुर्भाव झाला आहे. ४४० हेक्टर द्राक्षबागांना फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त डाळिंब, द्राक्षे फळबागांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त बागांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे करण्याचा आदेश दिला होता. याबाबतचा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यात मोठे नुकसान होऊनही डाळिंब, द्राक्ष या फळबागेचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बागांमध्ये न जाता, वस्तुस्थिती न पाहता पंचनामे कले आहेत. यामुळे पंचनामे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तालुक्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये अवकाळी ६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनाम्याची जबाबदारी न घेतल्यामुळे सर्व कृषी सहायकांनी मिळून सर्व पंचनामे ५० टक्क्यापेक्षा कमी दाखविले आहेत. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीपासूनही या शेतकऱ्यांना चुकीच्या पंचनाम्यामुळे वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)अवकाळीने नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्येपीक५० टक्केपेक्षा कमीजास्तएकूणडाळिंब१५८३.८९ हे.००२९७४.२१ हे.द्राक्षे११५० हे.००१५६७ हे.अधिवेशनात आवाज उठविण्याची मागणीनिसर्गाबरोबरच कृषी विभागाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. कार्यालयात बसून पंचनामे करणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. ७५ टक्केपेक्षा जास्त द्राक्षे, डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. बोगस पंचनाम्यांविषयी आ. विलासराव जगताप यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवावा, अशी आमची मागणी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर रेबगोंड यांनी सांगितले.