शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

जतमध्ये अवकाळीचा डाळिंबांना फटका

By admin | Updated: December 14, 2014 23:50 IST

चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप : शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित

दरीबडची : जत तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये अवकाळीने तडाखा दिल्याने द्राक्ष, डाळिंबबागांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये बहरात आलेले डाळिंब पीक एका रात्रीत फुटून गेले. ७५ टक्क्यावर बागा तेल्याने (बिब्ब्या) गेल्या असताना, कृषी विभागाने चुकीचे आणि वस्तुस्थिती न पाहता पंचनामे करून द्राक्षे व डाळिंब बागांचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान क्षेत्र दाखविले आहे. नैसर्गिक संकटाबरोबर मानवनिर्मित चुकीच्या पंचनाम्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. द्राक्षे व डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाले. दीड-दोन महिन्यात सलग दोन, तीनवेळा ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे डाळिंबावर तेल्या, तर द्राक्षावर दावण्याचा प्रादुर्भाव झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागा बहरात आलेली डाळिंबं एका रात्रीत फुटून गेली.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ९ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दुष्काळात पिचलेला आणि कर्जे काढलेला शेतकरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाने आर्थिक संकटात आला आहे. ज्या बागा फुलोऱ्यात (फ्लॉवरिंग स्टेज) होत्या, त्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ते ६० टक्के द्राक्षघडांची गळ झाली आहे. दावण्याचा प्रादुर्भाव झाला आहे. ४४० हेक्टर द्राक्षबागांना फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त डाळिंब, द्राक्षे फळबागांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त बागांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे करण्याचा आदेश दिला होता. याबाबतचा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यात मोठे नुकसान होऊनही डाळिंब, द्राक्ष या फळबागेचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बागांमध्ये न जाता, वस्तुस्थिती न पाहता पंचनामे कले आहेत. यामुळे पंचनामे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तालुक्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये अवकाळी ६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनाम्याची जबाबदारी न घेतल्यामुळे सर्व कृषी सहायकांनी मिळून सर्व पंचनामे ५० टक्क्यापेक्षा कमी दाखविले आहेत. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीपासूनही या शेतकऱ्यांना चुकीच्या पंचनाम्यामुळे वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)अवकाळीने नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्येपीक५० टक्केपेक्षा कमीजास्तएकूणडाळिंब१५८३.८९ हे.००२९७४.२१ हे.द्राक्षे११५० हे.००१५६७ हे.अधिवेशनात आवाज उठविण्याची मागणीनिसर्गाबरोबरच कृषी विभागाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. कार्यालयात बसून पंचनामे करणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. ७५ टक्केपेक्षा जास्त द्राक्षे, डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. बोगस पंचनाम्यांविषयी आ. विलासराव जगताप यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवावा, अशी आमची मागणी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर रेबगोंड यांनी सांगितले.