शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरोनापाठोपाठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा वाढता धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:28 IST

सांगली : कोरोना होऊन गेल्यानंतर बाधितांना अनेक व्याधी आणि आजारांचे निदान होत आहे. त्यात बुरशीजन्य आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे ...

सांगली : कोरोना होऊन गेल्यानंतर बाधितांना अनेक व्याधी आणि आजारांचे निदान होत आहे. त्यात बुरशीजन्य आजार असलेल्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दहा वर्षांत केवळ दाेन ते पाच रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यात सध्या किमान सहा ते सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अत्यंत दुर्मिळ असलेला हा आजार कोरोना होऊन गेलेल्यांसाठी त्रासदायक ठरत आहे.

कोरोना होऊन गेल्यानंतर बाधितांना अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे. सध्या म्युकरमायकोसिस या आजाराचा बाधितांत शिरकाव होत आहे. त्यातही मधुमेहाचा त्रास असलेल्यांना याचा धोका अधिक आहे.

दंतचिकित्सा व सर्जरीमध्ये काम करणाऱ्या शहरातील खासगी वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, या आजाराचा रूग्ण दहा वर्षांत एखादा आढळून येत असे. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून असे रुग्ण वाढत आहेत.

या आजारात डोळे आणि जबडा, दातांना त्रास सुरू होतो. कोरोना होऊन गेल्यानंतर डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, एकच वस्तू दुहेरी दिसणे अशी लक्षणे दिसतात, तर जबड्यांना व दातातून रक्त येण्याचे प्रकारही घडतात. कोरोनावर उपचार करताना देण्यात आलेली औषधे व त्याची मात्रा यामुळे हा बुरशीजन्य आजार बाधितांना जडत आहे.

सध्या सांगली, मिरज शहरातील रुग्णालयात सध्या सहा ते सात रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबत शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.