शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

वाढला पारा.. घामाच्या धारा!

By admin | Updated: April 14, 2017 22:16 IST

पारा @ 4० अंश : कऱ्हाडकर घामाघूम; उन्हापासून संरक्षणासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या

कऱ्हाड : एप्रिल सुरू होताच कऱ्हाड तालुक्यात उन्हाळ्याच्या प्रकोपाची सुरुवात झाली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा तडाखा सुरू होत आहे. तालुक्याच्या डोंगरी विभागातील पाणवठे पूर्णपणे आटण्याच्या मार्गावर आहेत. उष्माघातासारख्या उन्हाळी आजारांमुळे दवाखान्यांमधील रुग्णांची संख्या वाढली आहे. यावर्षी तालुक्यातील पाण्याच्या स्त्रोतांची अवस्था गेल्या वर्षी पेक्षा बऱ्यापैकी असली तरी लोकांमध्ये पाणी बचतीबाबत जागृती करण्याची गरज आहे.काही वर्षांच्या तुलनेत २०१६ मध्ये मान्सूनचे प्रमाण समाधानकारक राहिले होते. त्यामुळे तालुक्यातील नद्यांसह, पाझर तलाव व इतर पाणवठे ओसंडून वाहिले होते. परंतु अजूनही अनेक गावांमधील जलसंधारणाची कामे अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात झालेला पाणीसाठा उन्हाळा संपेपर्यंत टिकून राहिलच याची खात्री देता येत नाही. कृष्णा नदीकाठच्या गावांना पाणीटंचाई फारशी जाणवत नसते. परंतु दक्षिणच्या डोंगरी विभागातील तसेच मसूर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये प्रत्येक वर्षी पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे प्रत्येक वर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक मान्सूनमुळे यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याची शक्यता होती. परंतु मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतर अनेक गावांमधून पाण्याच्या टँकरची मागणी वाढू लागली आहे.चांगल्या मान्सूनमुळे यावर्षी तालुक्यात विक्रमी थंडीची नोंद करण्यात आली. जानेवारी महिन्यात तर किमान तापमानाचा पारा अनेक वर्षांनंतर आठ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता. अगदी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत थंडीची तीव्रता जाणवतच होती. सध्या एप्रिल महिन्याच्या मध्यांतरातच कमाल तापमानाची पातळी ३९, ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचली आहे. सकाळी दहा ते अगदी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी रस्ते ओस पडताना दिसू लागले आहेत. उन्हाळी फळे समजल्या जाणाऱ्या द्राक्षे, कलिंगड, काकड्या यांचीही बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. कऱ्हाड शहर तसेच तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर कोल्ड्रिंक्सचे गाडे जागा व्यापू लागले आहेत. कृष्णा घाटावरील प्रीतिसंगमावर पोहण्यासाठी तसेच येथील बागेत फिरायला येणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे. अगदी गरजेचे असेल तरच दुपारच्या वेळी लोक घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. महिला, महाविद्यालयीन तरुणींबरोबरच तरुण वर्गही दुचाकी चालवताना तोंडाला स्कार्फ बांधूनच बाहेर पडताना दिसत आहे.प्रामुख्याने कृष्णा आणि कोयना नदीपासून दूर असणाऱ्या गावांमध्ये पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत. पाझर तलावांमधील पाणी पातळीही घटू लागली असल्यामुळे जून महिन्यापर्यंत म्हणजेच पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा पुरणार का? याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये सिमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. जलसंधारणाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा खरोखरच उपयोग झाला काय? हे आता लवकरच स्पष्ट होऊ शकणार आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानाचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात आला होता.प्रशासनाकडून तालुक्यात हे अभियान यशस्वी ठरत असल्याचेही सांगितले जात होते. परंतु हे अभियान खरोखरच यशस्वी ठरले की नाही त्याची चाचणी पुढील काही आठवड्यांतच होणार आहे. यावर्षी थंडीप्रमाणेच उन्हाळ्याचाही विक्रम नोंदवला जाणार अशी शक्यता आहे. (प्रतिनिधी)उन्हाळा संपताच ये रे माझ्या मागल्या!प्रशासनाकडून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी बचतीचे आव्हान केले जात असते. अनेक स्वयंसेवी संस्थाही या पाणी बचत अभियानात सहभागी होतात. मात्र, उन्हाळा संपताच हे अभियानही संपते आणि पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी जतन करण्यात ना प्रशासनाला रस असतो ना सामान्य नागरिकांना. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळ्यातील पाणी टंचाईची अवस्था ‘ये रे माझ्या मागल्या,’ अशीच बनत असते.