शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये वाढली गुडघेदुखी??????????????????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST

सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण ...

सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे डॉक्टरांना आढळले आहे.

गेल्या ऑक्टोबरपासून सांगली-मिरजेतील अस्थिउपचार रुग्णालयांत अशा रुग्णांची वाढलेली संख्या डॉक्टरांच्यादृष्टीने चकित करणारी आहे. लॉकडाऊनच्या काळात सलग सात-आठ महिने नागरिकांनी घरात बसून काढले. फिरायला जाणे, व्यायाम करणे हा रोजचा परिक्रम बंद झाला. रस्त्यावर पोलीस आणि कोरोनाचा संसर्ग या दोहोंच्या भीतीने अंगणातही येता आले नाही. टीव्ही व संगणकासमोर बसून दिवस काढल्याने गुडघेदुखी बळावली.

अनेकांना पूर्वीपासूनच गुडघेदुखी सतावत होती, पण लॉकडाऊन काळात शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या. त्यामुळेही गुडघेदुखी आणखी बळावली. वेदनाशामक गोळ्या व मलम वापरून रुग्णांनी कशीबशी कळ काढली. हे रुग्ण लॉकडाऊननंतर रुग्णालयात गर्दी करु लागले आहेत. शासकीय रुग्णालयात गर्दी होत आहे.

गुडघेदुखीची अशी घ्यावी काळजी...

अनियमित जीवनशैलीमुळे गुडघेदुखी बळावते, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. जास्त वेळ एकाच ठिकाणी मांडी घालून बसणे, सातत्याने जिने चढ-उतार करणे, आवाक्याबाहेरील ओझे उचलणे ही गुडघेदुखीची काही प्रमुख कारणे आहेत. वाढलेले वजन हेदेखील प्रमुख कारण आहे. वजन नियंत्रणात आणल्यास गुडघ्यांवर ताण पडत नाही. वयोमानानुसार हाडांची झीज झाल्यानेही गुडघे दुखतात. योग्य औषधोपचार आणि तज्ज्ञांकडून शस्त्रक्रिया हेच त्यावरील उपाय आहेत, अशी माहिती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश शिंदे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात मेडिकलमधून औषधे घेऊन लोकांनी वेदनांवर नियंत्रण मिळविले. सांधेदुखी, संसर्ग किंवा मार लागल्यानेही लोकांना गुडघेदुखीला तोंड द्यावे लागते. हे रुग्ण आता रुग्णालयात येताहेत. आठ महिने लॉकडाऊनमध्ये बसून काढल्याने पायांची हालचाल मंदावली. योग्य काळजी घेतल्यास चिंतेची वेळ येणार नाही.

- डॉ. गिरीश शिंदे, अस्थिरोगतज्ज्ञ

अंगावर काढण्याने आजार बळावले

कोरोनाने लॉकडाऊन आणले आणि लॉकडाऊनने बैठे रोग दिले, अशी काहीशी स्थिती आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाच्या भीतीने लोकांनी रुग्णालयात जाणे टाळले. अनेक आजार अंगावरच काढले. मेडिकलमधून गोळ्या घेऊन दिवस काढले. हे आजार नंतर बळावले. लॉकडाऊन संपताच रुग्णालयांत अशा रुग्णांची गर्दी होऊ लागली. सांगलीतील शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण संख्या दररोज हजारापर्यंत पोहोचली. त्यातील अनेकांचे आजार प्राथमिक उपचारांच्या पुढे गेले होते.

--------------