शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

लॉकडाऊनमध्ये वाढली गुडघेदुखी??????????????????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST

सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण ...

सांगली : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने खालावत असताना, अन्य आजारांची संख्या मात्र वाढत आहे. विशेषत: गुडघेदुखी, सांधेदुखीच्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे डॉक्टरांना आढळले आहे.

गेल्या ऑक्टोबरपासून सांगली-मिरजेतील अस्थिउपचार रुग्णालयांत अशा रुग्णांची वाढलेली संख्या डॉक्टरांच्यादृष्टीने चकित करणारी आहे. लॉकडाऊनच्या काळात सलग सात-आठ महिने नागरिकांनी घरात बसून काढले. फिरायला जाणे, व्यायाम करणे हा रोजचा परिक्रम बंद झाला. रस्त्यावर पोलीस आणि कोरोनाचा संसर्ग या दोहोंच्या भीतीने अंगणातही येता आले नाही. टीव्ही व संगणकासमोर बसून दिवस काढल्याने गुडघेदुखी बळावली.

अनेकांना पूर्वीपासूनच गुडघेदुखी सतावत होती, पण लॉकडाऊन काळात शस्त्रक्रिया लांबणीवर टाकाव्या लागल्या. त्यामुळेही गुडघेदुखी आणखी बळावली. वेदनाशामक गोळ्या व मलम वापरून रुग्णांनी कशीबशी कळ काढली. हे रुग्ण लॉकडाऊननंतर रुग्णालयात गर्दी करु लागले आहेत. शासकीय रुग्णालयात गर्दी होत आहे.

गुडघेदुखीची अशी घ्यावी काळजी...

अनियमित जीवनशैलीमुळे गुडघेदुखी बळावते, असे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. जास्त वेळ एकाच ठिकाणी मांडी घालून बसणे, सातत्याने जिने चढ-उतार करणे, आवाक्याबाहेरील ओझे उचलणे ही गुडघेदुखीची काही प्रमुख कारणे आहेत. वाढलेले वजन हेदेखील प्रमुख कारण आहे. वजन नियंत्रणात आणल्यास गुडघ्यांवर ताण पडत नाही. वयोमानानुसार हाडांची झीज झाल्यानेही गुडघे दुखतात. योग्य औषधोपचार आणि तज्ज्ञांकडून शस्त्रक्रिया हेच त्यावरील उपाय आहेत, अशी माहिती अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश शिंदे यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात मेडिकलमधून औषधे घेऊन लोकांनी वेदनांवर नियंत्रण मिळविले. सांधेदुखी, संसर्ग किंवा मार लागल्यानेही लोकांना गुडघेदुखीला तोंड द्यावे लागते. हे रुग्ण आता रुग्णालयात येताहेत. आठ महिने लॉकडाऊनमध्ये बसून काढल्याने पायांची हालचाल मंदावली. योग्य काळजी घेतल्यास चिंतेची वेळ येणार नाही.

- डॉ. गिरीश शिंदे, अस्थिरोगतज्ज्ञ

अंगावर काढण्याने आजार बळावले

कोरोनाने लॉकडाऊन आणले आणि लॉकडाऊनने बैठे रोग दिले, अशी काहीशी स्थिती आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्गाच्या भीतीने लोकांनी रुग्णालयात जाणे टाळले. अनेक आजार अंगावरच काढले. मेडिकलमधून गोळ्या घेऊन दिवस काढले. हे आजार नंतर बळावले. लॉकडाऊन संपताच रुग्णालयांत अशा रुग्णांची गर्दी होऊ लागली. सांगलीतील शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण संख्या दररोज हजारापर्यंत पोहोचली. त्यातील अनेकांचे आजार प्राथमिक उपचारांच्या पुढे गेले होते.

--------------