शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

‘ताकारी-टेंभू’ योजनेच्या पाणीपट्टी दरात वाढ

By admin | Updated: December 12, 2015 00:18 IST

शेतकरी नाराज : वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर

कडेगाव/देवराष्ट्रे : कायम दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी आकारणी दरामध्ये वाढ होत असल्याचा प्रस्ताव संबंधित योजनेकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. वीज दरवाढीचा शॉक आता पाणीपट्टी दरवाढीच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ताकारी योजनेची पाणीपट्टी बागायती पिकांसाठी ७२२ रुपयांनी वाढली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. वाढलेली पाणीपट्टी तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ताकारी आणि टेंभू या दोन्ही उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात हजारो हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखाने पाणीपट्टी कपात करून घेतात व योजनेकडे भरतात. यामुळे दोन्ही योजना कार्यरत आहेत. २०१४-१५ च्या हंगामात ताकारी योजनेसाठी एकरी ६२११ रुपये पाणीपट्टी आकारणी ऊस पिकासाठी केली होती. परंतु आता वीज दरवाढ तसेच देखभाल-दुरुस्ती खर्च वाढल्याने २०१५-१६ साठी ताकारी योजनेची ७१७३ प्रति एकर याप्रमाणे पाणीपट्टी आकारणीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत ९६२ रुपये प्रति एकर वाढ होत आहे. (वार्ताहर)दरवाढीबाबत फेरविचार व्हावा----याबाबत पाणी वापर संस्था सिंचनचे अध्यक्ष सुबराव महाडिक म्हणाले की, आघाडी शासनाच्या काळात डॉ. पतंगराव कदम मदत व पुनर्वसनमंत्री असताना राज्याच्या टंचाई उपाययोजना निधीतून दुष्काळी परिस्थितीत योजनांची आवर्तने दिली. त्यापेक्षा भीषण दुष्काळ पडला असताना, सध्याचे शासन टंचाई निधीतून आवर्तनाचा निर्णय घेत नाही. शासनाने याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन टंचाई निधीतून योजनांचे आवर्तन द्यावे. वाजवीपेक्षा जास्त दराने पाणी घेणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. यामुळे पाणीपट्टी दरवाढीबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. योजना वर्ष एकरी पाणीपट्टी ताकारी २०१४-१५ ६२११ ताकारी २०१५-१६ ७१७३ वाढ ९६२ रुपयेटेंभू २०१४-१५ ६९६०टेंभू २०१५-१६ ७६८२ वाढ ७२२ रुपये