शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘ताकारी-टेंभू’ योजनेच्या पाणीपट्टी दरात वाढ

By admin | Updated: December 12, 2015 00:18 IST

शेतकरी नाराज : वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर

कडेगाव/देवराष्ट्रे : कायम दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या ताकारी व टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टी आकारणी दरामध्ये वाढ होत असल्याचा प्रस्ताव संबंधित योजनेकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. वीज दरवाढीचा शॉक आता पाणीपट्टी दरवाढीच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे. ताकारी योजनेची पाणीपट्टी बागायती पिकांसाठी ७२२ रुपयांनी वाढली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. वाढलेली पाणीपट्टी तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ताकारी आणि टेंभू या दोन्ही उपसा सिंचन योजनांच्या लाभक्षेत्रात हजारो हेक्टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखाने पाणीपट्टी कपात करून घेतात व योजनेकडे भरतात. यामुळे दोन्ही योजना कार्यरत आहेत. २०१४-१५ च्या हंगामात ताकारी योजनेसाठी एकरी ६२११ रुपये पाणीपट्टी आकारणी ऊस पिकासाठी केली होती. परंतु आता वीज दरवाढ तसेच देखभाल-दुरुस्ती खर्च वाढल्याने २०१५-१६ साठी ताकारी योजनेची ७१७३ प्रति एकर याप्रमाणे पाणीपट्टी आकारणीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला आहे. ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत ९६२ रुपये प्रति एकर वाढ होत आहे. (वार्ताहर)दरवाढीबाबत फेरविचार व्हावा----याबाबत पाणी वापर संस्था सिंचनचे अध्यक्ष सुबराव महाडिक म्हणाले की, आघाडी शासनाच्या काळात डॉ. पतंगराव कदम मदत व पुनर्वसनमंत्री असताना राज्याच्या टंचाई उपाययोजना निधीतून दुष्काळी परिस्थितीत योजनांची आवर्तने दिली. त्यापेक्षा भीषण दुष्काळ पडला असताना, सध्याचे शासन टंचाई निधीतून आवर्तनाचा निर्णय घेत नाही. शासनाने याबाबतीत तातडीने निर्णय घेऊन टंचाई निधीतून योजनांचे आवर्तन द्यावे. वाजवीपेक्षा जास्त दराने पाणी घेणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. यामुळे पाणीपट्टी दरवाढीबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. योजना वर्ष एकरी पाणीपट्टी ताकारी २०१४-१५ ६२११ ताकारी २०१५-१६ ७१७३ वाढ ९६२ रुपयेटेंभू २०१४-१५ ६९६०टेंभू २०१५-१६ ७६८२ वाढ ७२२ रुपये