शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

पशुधनासाठी टँकरने वाढीव पाणीपुरवठा

By admin | Updated: May 5, 2016 00:21 IST

दिलीप कांबळे : पाणी योजनांची वीज तोडणार नाही

तासगाव : अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी प्रशासनाकडून तातडीने पाणी टँकर सुरु करण्यासह, अन्य उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र अशा गावांतील पशुधन वाचविण्यासाठी यापुढे टँकरने वाढीव पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. तसेच पुढील महिन्याभरात प्रादेशिकसह पिण्याच्या पाणी योजनांचे वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.राज्य शासनाकडून दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी ‘एक तालुका एक मंत्री’ असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तासगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मंत्री कांबळे बुधवारी तासगाव तालुक्यात आले होते. तालुक्यातील नरसेवाडी, धामणी, पाडळी गावांची पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले उपस्थित होते. मंत्री दिलीप कांबळे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची बारकाईने पाहणी करुन तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने तासगाव तालुक्यातील काही गावांची पाहणी केली. तालुक्यातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा ठिकाणी दुष्काळासंदर्भातील निर्णय कायद्याच्या चौकटीत न अडकवता घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अनेक गावांत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवठा होत असलेल्या गावांत पशुधनासाठीदेखील पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. एक टँकर पाणी दिले जात असलेल्या ठिकाणी यापुढे जनावरांसाठी दीड टँकर पाणी पुरवठा करण्यात येईल. टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणी उपलब्ध करुन देत असताना, कायमस्वरुपी पाणी योजना सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार सुमनताई पाटील यांनी मागणी केल्यानुसार, शक्य असल्यास म्हैसाळ योजना टंचाई काळात कायमस्वरुपी कार्यान्वित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे टंचाई काळात यापुढे वीज बिल भरले नसले तरीदेखील प्रादेशिक पाणी योजनांची वीज कनेक्शन्स तोडण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेतला आहे. याबाबत वीज मंत्र्यांशी चर्चा करुन महावितरणच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील, असेही कांबळे यांनी सांगितले.‘प्रादेशिक’च्या वीज बिल आकारणीचा निर्णय आठ दिवसांत प्रादेशिक पाणी योजनांना व्यावसायिक पध्दतीने वीज बिल आकारणी केली जाते. त्यामुळे योजनेचे १६ कोटींचे वीज बिल थकीत आहे. हे वीज बिल शासनाने भरुन, यापुढे सिंचन योजनांप्रमाणे कमी दराने वीज बिल आकारणी करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली होती. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ दिवसांत निर्णय घेऊन वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.शेततळ्यांचे कोल्हापूर, साताऱ्याचे उद्दिष्ट सांगलीला देणार तासगाव तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेसाठी १ हजार ३६५ प्रस्ताव दाखल झाले. तालुक्यासाठी अवघे दोनशे शेततळ्यांचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट वाढवून मिळावे, अशी मागणी आढावा बैठकीत करण्यात आली. याबाबत राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात शेततळ्यांना मागणी नाही. या दोन जिल्ह्यांतील शेततळ्यांचे उद्दिष्ट सांगली जिल्ह्याला देण्याचा निर्णय घेतला जाईल. याबाबत दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करुन तातडीने निर्णय घेतला जाईल. त्यामुळे जिल्'ातील शेतकऱ्यांना शेततळ्यांचा वाढीव फायदा घेता येईल.