शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात २२९० हेक्टरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ...

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. २०१९ च्या तुलनेत यावर्षी दोन हजार २९० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. पण, सोयाबीन, करडई, सूर्यफूल पेरणीचे क्षेत्र घटले आहे. भुईमुगाच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी भागामध्ये फिरले आहे. यामुळे येथील गळीत धान्य पिकाची जागा ऊस, भाजीपाला आणि फळबागांनी घेतल्याचे आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील चित्र आहे. सोयाबीनची २०१९ मध्ये ४२ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झाल्यामुळे २०२० मध्ये सोयाबीनच्या पेरणीत ९०८ हेक्टरने घट झाली आहे. करडई, सूर्यफूल, तिळाच्या पेरणीत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. करडईची दहा वर्षात नीचांकी २०० हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे. भुईमुगाचे क्षेत्र मात्र दुष्काळी भागासह सधन वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज पश्चिम भागामध्येही वाढले आहे. एकूण गळीत धान्याची पेरणी मात्र दोन हजार २९० हेक्टरने वाढली आहे. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना सूर्यफूल, करडईचे क्षेत्र घटले आहे.

चौकट

करडई हद्दपार

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यामध्ये २००५ पर्यंत करडई पिकाची चार हजार हेक्टरपर्यंत पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीमध्ये करडईची पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीची जागा बागायत पिकाने घेतल्यामुळे करडई पेरण्याकडील शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. करडईची पेरणी सध्या केवळ भाजीपुरतीच होत आहे. सध्या केवळ दोनशे हेक्टरपर्यंतच पेरणी होत आहे. जत, आटपाडी तालुक्यातच ती होत आहे. औषधासाठीही करडई सापडत नाही, असे शेतकरी म्हणत आहेत.

कोट

वीस वर्षांपूर्वी शेतकरी करडई, सूर्यफुल, भुईमूग याचे एकत्रित घाण्यावर तेल काढून आणत होते. या तेलावरच आमची दिवाळी पूर्ण होऊन पुढे दोन महिने घरात त्याचा वापर होत होता. अत्यंत चविष्ट असेच ते तेल असायचे. सध्या ही परंपरा पूर्णत: नाहीशी झाली आहे. तेल बियाणांपासून तेल काढण्याचा व्यवसाय जवळपास बंद झाल्यामुळे पेरणीही कमी झाली आहे.

- सुरेश जगताप, शेतकरी.

कोट

सोयाबीनमध्ये २० टक्केच तेल असून ४२ टक्के प्रोटिन जास्त आहेत. तरीही सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. करडई, सूर्यफुलाची दुष्काळी भागामध्ये पेरणी होत होती. पण, गेल्या चार वर्षापासून शेतकरी करडई, सूर्यफुलाऐवजी भुईमूग, सोयाबीन पेरणीकडे वळला आहे.

- धनाजी पाटील,

जिल्हा कृषी अधिकारी, जि. प. सांगली.