शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

जिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात २२९० हेक्टरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ...

सांगली : जिल्ह्यात एकूण गळीत धान्य पिकाच्या पेरणीचे सरासरी ७८ हजार ६३ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी यावर्षी ७७ हजार ८०२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. २०१९ च्या तुलनेत यावर्षी दोन हजार २९० हेक्टरने पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. पण, सोयाबीन, करडई, सूर्यफूल पेरणीचे क्षेत्र घटले आहे. भुईमुगाच्या क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनांचे पाणी दुष्काळी भागामध्ये फिरले आहे. यामुळे येथील गळीत धान्य पिकाची जागा ऊस, भाजीपाला आणि फळबागांनी घेतल्याचे आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील चित्र आहे. सोयाबीनची २०१९ मध्ये ४२ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झाल्यामुळे २०२० मध्ये सोयाबीनच्या पेरणीत ९०८ हेक्टरने घट झाली आहे. करडई, सूर्यफूल, तिळाच्या पेरणीत मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. करडईची दहा वर्षात नीचांकी २०० हेक्टर क्षेत्रातच पेरणी झाली आहे. भुईमुगाचे क्षेत्र मात्र दुष्काळी भागासह सधन वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज पश्चिम भागामध्येही वाढले आहे. एकूण गळीत धान्याची पेरणी मात्र दोन हजार २९० हेक्टरने वाढली आहे. तेलाच्या मागणीत वाढ होत असताना सूर्यफूल, करडईचे क्षेत्र घटले आहे.

चौकट

करडई हद्दपार

जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यामध्ये २००५ पर्यंत करडई पिकाची चार हजार हेक्टरपर्यंत पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीमध्ये करडईची पेरणी होत होती. कोरडवाहू जमिनीची जागा बागायत पिकाने घेतल्यामुळे करडई पेरण्याकडील शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. करडईची पेरणी सध्या केवळ भाजीपुरतीच होत आहे. सध्या केवळ दोनशे हेक्टरपर्यंतच पेरणी होत आहे. जत, आटपाडी तालुक्यातच ती होत आहे. औषधासाठीही करडई सापडत नाही, असे शेतकरी म्हणत आहेत.

कोट

वीस वर्षांपूर्वी शेतकरी करडई, सूर्यफुल, भुईमूग याचे एकत्रित घाण्यावर तेल काढून आणत होते. या तेलावरच आमची दिवाळी पूर्ण होऊन पुढे दोन महिने घरात त्याचा वापर होत होता. अत्यंत चविष्ट असेच ते तेल असायचे. सध्या ही परंपरा पूर्णत: नाहीशी झाली आहे. तेल बियाणांपासून तेल काढण्याचा व्यवसाय जवळपास बंद झाल्यामुळे पेरणीही कमी झाली आहे.

- सुरेश जगताप, शेतकरी.

कोट

सोयाबीनमध्ये २० टक्केच तेल असून ४२ टक्के प्रोटिन जास्त आहेत. तरीही सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. करडई, सूर्यफुलाची दुष्काळी भागामध्ये पेरणी होत होती. पण, गेल्या चार वर्षापासून शेतकरी करडई, सूर्यफुलाऐवजी भुईमूग, सोयाबीन पेरणीकडे वळला आहे.

- धनाजी पाटील,

जिल्हा कृषी अधिकारी, जि. प. सांगली.