शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

रुग्णालयातील बेडची संख्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST

सांगली : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत, अनेक गावांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तात्काळ रुग्णालयातील बेडची संख्या वाढवावी, किमान एक ...

सांगली : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत, अनेक गावांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तात्काळ रुग्णालयातील बेडची संख्या वाढवावी, किमान एक हजार बेड वाढतील अशी व्यवस्था करा, अशी मागणी कोरोना रुग्ण साह्य व समन्वय समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्याची महती वेगवेगळ्या माध्यमातून जगभर पसरलेली आहे. त्यामध्ये तत्कालीन प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते, खेळाडू, व्यापार व उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने अनेकांनी जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. पालकमंत्री जयंत पाटील हे महाराष्ट्रातील एक मुरब्बी राजकीय नेते म्हणून परिचित आहेत. राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्यामागे पतंगराव कदम यांचा मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी आणखी प्रयत्न केले तर कोरोना रुग्णांना वाचवता येऊ शकते. जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणत ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. मिरज सिव्हिल, मिरज वॉन्लेस हॉस्पिटल, इस्लामपूरचे प्रकाश हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल या ठिकाणी बेड वाढवता येतील.

या सर्व ठिकाणी किमान एक हजार ते बाराशे बेड तयार होऊ शकतात. राज्याचे अन्न व औषध प्रशासन सचिव यांच्या नवीन आदेशानुसार कोल्हापूर ऑक्सिजन प्लांटमधून होणारा ऑक्सिजन पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. त्यामुळे किमान रोज पाच ते सात टन ऑक्सिजनची कमतरता भासणार आहे. त्याबाबतही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.