शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कौटुंबिक कारणातून खुनाच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत बनले असताना, कुटुंबातील कलह वाढतानाचे चिंताजनक चित्र आहे. अनैतिक संबंध, चारित्र्यावर ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत बनले असताना, कुटुंबातील कलह वाढतानाचे चिंताजनक चित्र आहे. अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय व अशाच कौटुंबिक कलहातून खुनाच्या घटना या पंधरवड्यात घडल्या आहेत. मांजर्डे (ता. तासगाव) येथील दुहेरी खून वगळता इतर सर्व खुनाच्या घटना या कौटुंबिक कारणाने झाल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे बिघडलेले आर्थिक गणित, घरातच थांबण्याचा वाढलेला काळ आणि त्यामुळे वाढलेल्या वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. यातून वादावादीसह मारहाण आणि इतर गुन्हेही पोलिसांनी दाखल केले आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच घडलेल्या खुनाच्या घटना या पूर्णपणे क्षणिक कारणावरून घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनाही त्यावर नियंत्रण मिळवताना आव्हान येत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीलाच तासगाव तालुक्यात मांजर्डे येथील दुहेरी खुनाने जिल्हा हादरला होता. खुनामागील नेमके कारण आणि संशयिताच्या तपासाचेही पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे या दुहेरी खुनातील संशयिताला पोलिसांनी अटक केली.

जत तालुक्यातील खिलारवाडी येथे मामानेच भाच्याचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली. मुलीला पळवून नेल्याच्या रागातून ही घटना घडली होती. या खुनाच्या घटनेपासून कौटुंबिक विसंवाद, रागामुळे ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सर्व चार संशयितांना अटक केली.

कोणतीही खुनाची घटना घडली की त्यामागे रम, रमा आणि रमी हेच कारण असल्याचे अनेकदा स्पष्ट होते. त्याचा तपास करतानाही पोलीसही हीच बाजू तपासून संशयितांपर्यंत पोहोचत असतात. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथील खुनाची घटना अनैतिक संबंधातून तर मिरजेत चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा केलेला खून या घटनांमागे क्षणिक कारण असल्याने पोलिसांना अशा घटनांवर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. संघटित अथवा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात असले, तरी कौटुंबिक कारणावरून होत असलेल्या या घटनांमुळे कौटुंबिक कलह आणि विसंवाद समोर आला आहे.

चौकट

राग आणि भीक माग

पंधरवड्यातील खुनाच्या घटनांचा मागोवा घेतला तर क्षणिक रागातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेला पतीचा खून, पतीने केलेली पत्नीची हत्या आणि राग मनात धरून मामाने केलेला भाच्याचा खून या घटनांत राग कारणीभूत ठरल्याने त्यांना कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.