शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

जिल्ह्यात कौटुंबिक कारणातून खुनाच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत बनले असताना, कुटुंबातील कलह वाढतानाचे चिंताजनक चित्र आहे. अनैतिक संबंध, चारित्र्यावर ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत बनले असताना, कुटुंबातील कलह वाढतानाचे चिंताजनक चित्र आहे. अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय व अशाच कौटुंबिक कलहातून खुनाच्या घटना या पंधरवड्यात घडल्या आहेत. मांजर्डे (ता. तासगाव) येथील दुहेरी खून वगळता इतर सर्व खुनाच्या घटना या कौटुंबिक कारणाने झाल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे बिघडलेले आर्थिक गणित, घरातच थांबण्याचा वाढलेला काळ आणि त्यामुळे वाढलेल्या वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. यातून वादावादीसह मारहाण आणि इतर गुन्हेही पोलिसांनी दाखल केले आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच घडलेल्या खुनाच्या घटना या पूर्णपणे क्षणिक कारणावरून घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनाही त्यावर नियंत्रण मिळवताना आव्हान येत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीलाच तासगाव तालुक्यात मांजर्डे येथील दुहेरी खुनाने जिल्हा हादरला होता. खुनामागील नेमके कारण आणि संशयिताच्या तपासाचेही पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे या दुहेरी खुनातील संशयिताला पोलिसांनी अटक केली.

जत तालुक्यातील खिलारवाडी येथे मामानेच भाच्याचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली. मुलीला पळवून नेल्याच्या रागातून ही घटना घडली होती. या खुनाच्या घटनेपासून कौटुंबिक विसंवाद, रागामुळे ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सर्व चार संशयितांना अटक केली.

कोणतीही खुनाची घटना घडली की त्यामागे रम, रमा आणि रमी हेच कारण असल्याचे अनेकदा स्पष्ट होते. त्याचा तपास करतानाही पोलीसही हीच बाजू तपासून संशयितांपर्यंत पोहोचत असतात. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथील खुनाची घटना अनैतिक संबंधातून तर मिरजेत चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा केलेला खून या घटनांमागे क्षणिक कारण असल्याने पोलिसांना अशा घटनांवर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. संघटित अथवा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात असले, तरी कौटुंबिक कारणावरून होत असलेल्या या घटनांमुळे कौटुंबिक कलह आणि विसंवाद समोर आला आहे.

चौकट

राग आणि भीक माग

पंधरवड्यातील खुनाच्या घटनांचा मागोवा घेतला तर क्षणिक रागातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेला पतीचा खून, पतीने केलेली पत्नीची हत्या आणि राग मनात धरून मामाने केलेला भाच्याचा खून या घटनांत राग कारणीभूत ठरल्याने त्यांना कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.