शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जिल्ह्यात कौटुंबिक कारणातून खुनाच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:17 IST

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत बनले असताना, कुटुंबातील कलह वाढतानाचे चिंताजनक चित्र आहे. अनैतिक संबंध, चारित्र्यावर ...

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत बनले असताना, कुटुंबातील कलह वाढतानाचे चिंताजनक चित्र आहे. अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय व अशाच कौटुंबिक कलहातून खुनाच्या घटना या पंधरवड्यात घडल्या आहेत. मांजर्डे (ता. तासगाव) येथील दुहेरी खून वगळता इतर सर्व खुनाच्या घटना या कौटुंबिक कारणाने झाल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे बिघडलेले आर्थिक गणित, घरातच थांबण्याचा वाढलेला काळ आणि त्यामुळे वाढलेल्या वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. यातून वादावादीसह मारहाण आणि इतर गुन्हेही पोलिसांनी दाखल केले आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच घडलेल्या खुनाच्या घटना या पूर्णपणे क्षणिक कारणावरून घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनाही त्यावर नियंत्रण मिळवताना आव्हान येत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीलाच तासगाव तालुक्यात मांजर्डे येथील दुहेरी खुनाने जिल्हा हादरला होता. खुनामागील नेमके कारण आणि संशयिताच्या तपासाचेही पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, तांत्रिक तपासाच्या आधारे या दुहेरी खुनातील संशयिताला पोलिसांनी अटक केली.

जत तालुक्यातील खिलारवाडी येथे मामानेच भाच्याचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली. मुलीला पळवून नेल्याच्या रागातून ही घटना घडली होती. या खुनाच्या घटनेपासून कौटुंबिक विसंवाद, रागामुळे ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी सर्व चार संशयितांना अटक केली.

कोणतीही खुनाची घटना घडली की त्यामागे रम, रमा आणि रमी हेच कारण असल्याचे अनेकदा स्पष्ट होते. त्याचा तपास करतानाही पोलीसही हीच बाजू तपासून संशयितांपर्यंत पोहोचत असतात. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी येथील खुनाची घटना अनैतिक संबंधातून तर मिरजेत चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच पत्नीचा केलेला खून या घटनांमागे क्षणिक कारण असल्याने पोलिसांना अशा घटनांवर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. संघटित अथवा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश मिळाल्याने गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात असले, तरी कौटुंबिक कारणावरून होत असलेल्या या घटनांमुळे कौटुंबिक कलह आणि विसंवाद समोर आला आहे.

चौकट

राग आणि भीक माग

पंधरवड्यातील खुनाच्या घटनांचा मागोवा घेतला तर क्षणिक रागातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केलेला पतीचा खून, पतीने केलेली पत्नीची हत्या आणि राग मनात धरून मामाने केलेला भाच्याचा खून या घटनांत राग कारणीभूत ठरल्याने त्यांना कोठडीत जाण्याची वेळ आली आहे.