शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशात धर्मांधतेच्या वातावरणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:37 IST

सांगली : जगभर समानता, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांवर घाला घालण्याचे प्रकार वाढत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात ...

सांगली : जगभर समानता, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांवर घाला घालण्याचे प्रकार वाढत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात आहे, हे क्लेशदायक असून, मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली देऊन देशात जाती-धर्मामुळे, लिंगामुळे विषमतेचे वातावरण वाढत आहे. समाजात विषमतेने अक्षरश: थैमान घातले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी रविवारी सांगलीत केले.ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार कार्यक्रम शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित केला होता, यावेळी डॉ. देवी बोलत होते.डॉ. देवी म्हणाले, विशिष्ट विचारांची रुजवणूक व्हावी म्हणून समानता, स्वातंत्र्य, न्याय यासह इतर मूल्यांवर जगभर घाला घातला जात आहे. त्यामुळे अशा धोकादायक वातावरणातही मूल्यांची मशाल पेटत राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारखे विचारवंत मूल्यांची मशाल पेटती राहावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात आहे किंवा त्यांना दाभोलकर, पानसरे यांच्यासारखे मारले जात आहेत. विचारांना ठोकून होत असलेली हत्या ही शारीरिक हत्येपेक्षा अधिक क्लेशदायक ठरत आहे.आ. ह. साळुंखे यांच्याविषयी ते म्हणाले, एक पुस्तक लिहिणे म्हणजे एका नव्या जिवाला जन्म देण्यासारखे आहे. बुध्दीच्या प्रसववेदना पत्करून ६० पेक्षा अधिक ग्रंथ लिहिणे हे अद्वितीय कार्य ‘आ. ह.’ यांनी केले आहे. त्यांच्या विचारांची मोहिनी समाजावर पडली आहे. त्यांच्या अनेक ग्रंंथांतून विशिष्ट मूल्यांची जोपासना होत आली आहे. आता त्यांना दीर्घायुष्य मिळून, शंभरावर ग्रंथांचे लेखन त्यांच्याकडून व्हावे.