शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

देशात धर्मांधतेच्या वातावरणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:37 IST

सांगली : जगभर समानता, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांवर घाला घालण्याचे प्रकार वाढत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात ...

सांगली : जगभर समानता, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांवर घाला घालण्याचे प्रकार वाढत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात आहे, हे क्लेशदायक असून, मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली देऊन देशात जाती-धर्मामुळे, लिंगामुळे विषमतेचे वातावरण वाढत आहे. समाजात विषमतेने अक्षरश: थैमान घातले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी रविवारी सांगलीत केले.ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सत्कार कार्यक्रम शांतिनिकेतन लोकविद्यापीठ येथे आयोजित केला होता, यावेळी डॉ. देवी बोलत होते.डॉ. देवी म्हणाले, विशिष्ट विचारांची रुजवणूक व्हावी म्हणून समानता, स्वातंत्र्य, न्याय यासह इतर मूल्यांवर जगभर घाला घातला जात आहे. त्यामुळे अशा धोकादायक वातावरणातही मूल्यांची मशाल पेटत राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासारखे विचारवंत मूल्यांची मशाल पेटती राहावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. या काळात विचारवंतांच्या विचारांना नाकारले जात आहे किंवा त्यांना दाभोलकर, पानसरे यांच्यासारखे मारले जात आहेत. विचारांना ठोकून होत असलेली हत्या ही शारीरिक हत्येपेक्षा अधिक क्लेशदायक ठरत आहे.आ. ह. साळुंखे यांच्याविषयी ते म्हणाले, एक पुस्तक लिहिणे म्हणजे एका नव्या जिवाला जन्म देण्यासारखे आहे. बुध्दीच्या प्रसववेदना पत्करून ६० पेक्षा अधिक ग्रंथ लिहिणे हे अद्वितीय कार्य ‘आ. ह.’ यांनी केले आहे. त्यांच्या विचारांची मोहिनी समाजावर पडली आहे. त्यांच्या अनेक ग्रंंथांतून विशिष्ट मूल्यांची जोपासना होत आली आहे. आता त्यांना दीर्घायुष्य मिळून, शंभरावर ग्रंथांचे लेखन त्यांच्याकडून व्हावे.