शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

जत तालुक्यात विजेच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे, परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे, परंतु कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत मोटारी व विद्युत जनित्र जळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

२०१२ पासून मागील दहा वर्षांत शेतीपंपासाठी नवीन कनेक्शन देण्याची प्रक्रिया बंद आहे. तालुक्यात विंधन विहिरी, विहिरी, शेत तलावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पैसे भरूनही वेळेत वीजकनेक्शन मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हुक टाकून कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे डीपीवर लोड पडून कमी दाबाने वीजपुरवठा होताे. त्यामुळे विद्युत मोटारी जळण्याचे आणि डीपी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्याकडून बेकायदेशीर कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यांचे हुक काढून घेणे, फ्युज किंवा पेटी काढून घेणे असे प्रकार वेळोवेळी केले जातात, पण काही अधिकारी व कर्मचारी आर्थिक स्वार्थ साधून अशा शेतकऱ्यांना पाठीशी घालत आहेत. परिणामी, महावितरणचे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित वीजबिल भरून वीज कनेक्शन घेतले आहे, त्यांना विद्युत मोटारी व जनित्र जळाल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.

महावितरणने अनधिकृत कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्याचे कनेक्शन अधिकृत करून व डीपीची संख्या वाढविल्यास, कंपनीच्या उत्पन्नात भर पडून सर्वच शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज मिळू शकते. यासाठी विशेष मोहीम सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

डीपी (विद्युत जनित्र) नादुरुस्त झाला, तर अधिकृत कनेक्शन असलेल्या शेतकऱ्याकडून वर्गणी काढून त्याची दुरुस्ती केली जात आहे. डीपी दुरुस्तीची साेय जत येथे झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय कमी होणार आहे. त्यामुळे कवठेमहांकाळऐवजी जत येथे डीपी दुरुस्ती स्टेशन सुरू करावे, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.