शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

जत तालुक्यात विजेच्या मागणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे, परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे, परंतु कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे विद्युत मोटारी व विद्युत जनित्र जळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

२०१२ पासून मागील दहा वर्षांत शेतीपंपासाठी नवीन कनेक्शन देण्याची प्रक्रिया बंद आहे. तालुक्यात विंधन विहिरी, विहिरी, शेत तलावांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पैसे भरूनही वेळेत वीजकनेक्शन मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हुक टाकून कनेक्शन घेतले आहे. त्यामुळे डीपीवर लोड पडून कमी दाबाने वीजपुरवठा होताे. त्यामुळे विद्युत मोटारी जळण्याचे आणि डीपी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्याकडून बेकायदेशीर कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यांचे हुक काढून घेणे, फ्युज किंवा पेटी काढून घेणे असे प्रकार वेळोवेळी केले जातात, पण काही अधिकारी व कर्मचारी आर्थिक स्वार्थ साधून अशा शेतकऱ्यांना पाठीशी घालत आहेत. परिणामी, महावितरणचे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित वीजबिल भरून वीज कनेक्शन घेतले आहे, त्यांना विद्युत मोटारी व जनित्र जळाल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.

महावितरणने अनधिकृत कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्याचे कनेक्शन अधिकृत करून व डीपीची संख्या वाढविल्यास, कंपनीच्या उत्पन्नात भर पडून सर्वच शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीज मिळू शकते. यासाठी विशेष मोहीम सुरू करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

डीपी (विद्युत जनित्र) नादुरुस्त झाला, तर अधिकृत कनेक्शन असलेल्या शेतकऱ्याकडून वर्गणी काढून त्याची दुरुस्ती केली जात आहे. डीपी दुरुस्तीची साेय जत येथे झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय कमी होणार आहे. त्यामुळे कवठेमहांकाळऐवजी जत येथे डीपी दुरुस्ती स्टेशन सुरू करावे, अशी मागणी जत तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश माळी यांनी केली आहे.