शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर तालुक्यात अवकाळीने हानी

By admin | Updated: March 12, 2015 00:07 IST

वादळी वाऱ्यासह पाऊस : आळसंद परिसरात २१ हेक्टर द्राक्षाचे, २४ हेक्टर डाळिंबाचे नुकसान

विटा/आळसंद : विटा शहरासह खानापूर तालुक्यात मंगळवारी रात्री पुन्हा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यावेळी विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने द्राक्षे, डाळिंब, आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. सरासरी २५ मि.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, आळसंद परिसरात द्राक्षाचे सुमारे २१ हेक्टर, तर डाळिंब पिकाचे २४ हेक्टर नुकसान झाले. वादळी वाऱ्याने आळसंद येथील रामचंद्र मरिबा जाधव व कमळापूरचे संतोष गोतपागर यांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने त्यांचे नुकसान झाले.मंगळवारी रात्री आठ वाजता वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. आळसंद, कमळापूर, भाळवणी, कार्वे, मंगरूळ, बामणी, खानापूर, रेणावी, रेवणगाव, लेंगरे, माहुली परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने द्राक्षे, शाळू व गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. विटा मंडल विभागात २१ मि.मी., भाळवणी- १९, खानापूर- ४२, लेंगरे- २१ व करंजे मंडल विभागात १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.दरम्यान, आळसंद येथे मंगळवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने रामचंद्र जाधव यांच्या घराची भिंत कोसळली. कमळापूर येथील संतोष जालिंदर गोतपागर यांच्या घराचे पत्रे उडून गेले. आळसंद येथील सीताराम गणू हारूगडे यांचे २ एकर द्राक्षे, ५ एकर डाळिंब आणि २ एकर आंबा पिकाचे नुकसान झाले. जानू मारूती हारूगडे यांचे दोन एकर द्राक्षे व एक एकर डाळिंब, नामदेव रघुनाथ जाधव यांचे साडेसहा एकर डाळिंबाचे, अनिल मधुकर जाधव यांचे एक एकर द्राक्षाचे, हिंमतराव जाधव यांच्या नऊ एकर डाळिंबाचे, किरण सोपान कचरे यांच्या दोन एकर डाळिंबाचे, तानाजी सुर्वे यांच्या दोन एकर डाळिंबाचे, राधेशाम पोपट जाधव यांच्या पाच एकर डाळिंबाचे, वाझर येथील संग्राम जाधव यांच्या पाच एकर द्राक्षाचे, संजय रामचंद्र माने यांच्या चार एकर द्राक्षाचे, मनीषा रामचंद्र माने यांच्या चार एकर द्राक्षाचे, तसेच किसन सदाशिव जाधव यांच्या २० गुंठे गहू पिकाचे वादळी वारे व अवकाळी पावसाने नुकसान झाले. (वार्ताहर)