शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
5
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
6
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
7
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
8
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
9
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
10
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
11
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
12
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
13
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
14
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
15
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
16
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
17
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
18
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
19
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
20
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र

अंगीकृत भूमिकेला बगल देऊन लेखन अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST

मिरज : कविता स्वांतसुखायच असते. कोणतेही लेखन अंगीकृत भूमिकेला बगल देऊन करता येत नाही. कवी, लेखक मुळातच अव्वल असावा ...

मिरज : कविता स्वांतसुखायच असते. कोणतेही लेखन अंगीकृत भूमिकेला बगल देऊन करता येत नाही. कवी, लेखक मुळातच अव्वल असावा लागतो. लेखन परिसरसापेक्ष असत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले. मिरजेत ‘काव्यमनीषा’ कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

मनीषा रायजादे यांच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा. महाजन, कवी-गझलकार सुधाकर इमामदार, साहित्यिक आनंदहरी, कवी दयासागर बन्ने, कवयित्री मनीषा पाटील यांच्या हस्ते झाले. परिसंवादाचे अध्यक्ष प्रा. महाजन म्हणाले की, कविता अनमोल असते. कवीला समाजाचे सहकार्य मिळायला हवे. मनीषा रायजादे यांची कविता साहित्यिक ग. दि माडगूळकर यांच्या शैलीसारखी सुलभ, सहज, सोपी आहे. कविता अंतरंगात रुजते. स्वत:चा स्वतःशी वाद असल्याशिवाय, भांडण असल्याशिवाय चांगले लेखन करता येत नाही.

यावेळी प्रा. वसंत खोत, मेहबूब जमादार, प्रा. अनिलकुमार पाटील, नामदेव भोसले, गौतम कांबळे, विजय जंगम, सुहास पंडित, अश्विनी कुलकर्णी, चित्रकार सुमेध कुलकर्णी, त्रिशला शहा, शाहीर पाटील, निर्मला लोंढे, मुबारक उमराणी, उज्वला केळकर उपस्थित होते. वैभव चौगुले व जस्मिन शेख यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर पाटील यांनी प्रास्ताविक केले. अलका रायजादे- पाटील यांनी आभार मानले.