शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

कोरोनामुक्त गावासाठी महिलांचा महत्त्वपूर्ण सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनामुक्त गाव करण्यासाठी सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सरपंचांबरोबरच गावचे ग्रामस्थही त्यांच्या पाठीशी राहिले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनामुक्त गाव करण्यासाठी सरपंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सरपंचांबरोबरच गावचे ग्रामस्थही त्यांच्या पाठीशी राहिले. कोरोना गावमुक्तीत कुटुंबातील महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

जिल्ह्यातील गावांच्या सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीव्दारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमध्ये कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावचे सरपंच विजय मोहिते, कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळीच्या सरपंच नीता जाधव, वाळवा तालुक्यातील आष्टा-नागावचे उपसरपंच धनवंतराव पाटील यांच्याशी ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे आदी उपस्थित होते.

उध्दव ठाकरे म्हणाले, गेली दीड वर्षे आपण कोरोनाशी लढत आहोत. कोरोनाची पहिली लाट संपली आता दुसरी लाट सुरू आहे. ही लाट अत्यंत भयावह आहे. या लाटेत अनेकांनी आपले आप्तेष्ट, स्वकीय गमावले. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. असल्या भयावह लाटेतही काही ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कोरोना नियंत्रणाचे काम केले. त्यामुळे कोरोनाला अटकाव करू शकलो. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला तरीही आपण त्याच्यावर मात केली. त्यातच म्युकरमायकोसिस या रोगाचीही भर पडली. तरीही गावपातळीवर सावध राहून ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध बसला आहे.

चौकट

मोहित्यांचे वडगाव लवकरच कोराेनामुक्त

मोहित्यांच्या वडगावचे सरपंच विजय मोहिते यांनी कोरोनामुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिली. गावात ६७ रुग्ण कोरोनाबाधित होते, त्यांच्यावर यशस्वीपणे उपचार केले. सध्या केवळ चार रुग्ण उपचार घेत असून, तेही आठवड्याभरात बरे होतील. गावातील महिला वर्गाला विश्वासात घेऊन कोरोना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केल्याने आणि गावातील महिलांनी तितक्याच चांगल्या पध्दतीने प्रतिसाद दिल्याने गाव कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.