शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सुधारित पाणी योजना कार्यान्वित; तरी मिरजेत पाण्याची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:27 IST

मिरज शहरातील जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर वाढत्या लोकसंख्येचा ताण असल्याने शहरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अमृत योजनेसाठी सुमारे शंभर कोटी ...

मिरज शहरातील जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेवर वाढत्या लोकसंख्येचा ताण असल्याने शहरात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अमृत योजनेसाठी सुमारे शंभर कोटी खर्च करण्यात आले आहेत. मात्र, अमृत योजना पूर्ण होऊन कार्यान्वित झाल्यानंतरही पाण्याची समस्या कायम आहे. शहरातील अनेक रस्ते ड्रेनेज वाहिन्यांसाठी व अमृत योजनेच्या कामासाठी खुदाईमुळे अनेक ठिकाणी जुन्या जलवाहिन्या फुटल्या आहेत. यामुळे गळतीची समस्या कायम आहे. जलवाहिन्या नादुरुस्त असल्याने अनेक भागात जेथे पूर्वी दिवसातून दोनवेळा मुबलक पाणी नळाला येत होते तेथे आता अमृत योजनेचे कनेक्शन घेतल्यावर नळाला कमी दाबाने पाणी येत आहे.

शहरात ब्राह्मणपुरी परिसरात भानू तालीम परिसर, पाटील हौद परिसर, गजानन मंगल कार्यालय परिसर अशा ठिकाणी वॉटर एटीएम मशीनवरून विकत पाणी घेण्यासाठी रांगा लागत आहेत. जुनी पाणीपुरवठा यंत्रणा सुरू असताना अशी वेळ यापूर्वी आली नव्हती. शहरात पाणीटंचाई असल्याने मोटारी लावून पाणी खेचण्यात येत असल्याने पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे.

चौकट

गैरसोयीच्या तक्रारी

अमृत योजना कार्यान्वित होऊनसुद्धा पाणी मुबलक येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. कृष्णा नदीतून पाणी शुद्धिकरण केंद्रात आणून पाणी शुद्ध करून पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी कृष्णा घाट येथे केवळ पाणी उपशासाठी एक्सप्रेस फिडर बसवला आहे. एक्स्प्रेस फिडर वारंवार बंद पडत असल्याने पाणी उपशावर परिणाम होत आहे. अमृत योजनेचे पाणी सोडण्याच्या वेळाही गैरसोयीच्या आहेत. पाणी कमी दाबाने मिळते. पाणी सोडण्याच्या वेळा नागरिकांच्या गैरसोयीच्या असल्याच्या तक्रारी आहेत.