शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांगली जिल्ह्यातील अपघातसंख्येत तब्बल १३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:39 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब रस्ते, वेगावर नसलेले नियंत्रण आणि बेशिस्तपणा अशा अनेक गोष्टींमुळे जिल्ह्यातील अपघातांची संख्या वाढत आहे. २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये सांगली जिल्ह्यात १३ टक्के अपघात वाढले आहेत. राज्यातील अपघातांच्या वाढीचे प्रमाण 0.८० असताना जिल्ह्याचे हे प्रमाण चिंताजनक आहे.सांगली जिल्ह्यात एकीकडे वाहनसंख्येत वाढ होत असताना अरुंद व खराब रस्ते, रस्त्यावरील वाहनधारकांचा बेशिस्तपणा, अतिक्रमणे, वेगावर नसलेले नियंत्रण अशा कारणांनी अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरीही त्यात यश मिळताना दिसत नाही.आकडेवारी अधिकच...महाराष्टÑ मोटार वाहन विभागाने प्रसिद्ध केलेली ही आकडेवारी जानेवारी ते जून २0१८ पर्यंतची आहे. २0१७ मधील अपघात संख्येशी तिची तुलना केली आहे. अपघात संख्येतील आकडेवारीचा विचार करता कोल्हापूर राज्यात क्रमांक एकवर असून, सांगली राज्यात आठव्या क्रमांकावर आहे. अपघातात मृत्यू होण्याच्या बाबतीत कोल्हापूर क्रमांक एकवर, तर सांगली २२ व्या क्रमांकावर आहे, तर जखमींच्या संख्येतही कोल्हापूर क्रमांक एकवर असून, सांगली ११ व्या क्रमांकावर आहे.राज्यात २0१७ च्या तुलनेत २0१८ मध्ये एकूण अपघातसंख्येत 0.८० टक्के वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यात ही वाढ १३ टक्क्यांच्या घरात आहे. राज्यात अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ९.२७ टक्के वाढ झाली असताना जिल्ह्यात ही वाढ ८.६३ टक्के म्हणजे कमी दिसते. दुसरीकडे जखमींच्या आकडेवारीत राज्यात १.६७ टक्के वाढ असताना जिल्ह्यात ही वाढ १0.४0 टक्के दिसते. त्यामुळे अपघातसंख्या कमी होण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे बनले आहेवाहनसंख्येत होतेय झपाट्याने वाढदिवसागणिक वाहनसंख्या वाढत आहे. ३0 एप्रिल २0१९ च्या आकडेवारीनुसार एकूण वाहनसंख्या ९ लाख १५ हजार ६८७ इतकी आहे. ३१ मार्च २०१८ मध्ये ही संख्या ८ लाख ५० हजार ७४८ इतकी होती. म्हणजेच जवळपास एक वर्षात वाहनसंख्येत ६४ हजार ९३९ ची भर पडली. म्हणजेच जिल्ह्यात महिन्याकाठी जवळपास साडेपाच हजार वाहने रस्त्यावर येत आहेत. .