शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

विटा शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटेकरांना नागरी सुविधा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. नागरीकांची एकही तक्रार आमच्यापर्यंत यायला नको ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : विटेकरांना नागरी सुविधा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. नागरीकांची एकही तक्रार आमच्यापर्यंत यायला नको याची दक्षता घ्या, असे सांगून विटा शहरात अनियमीत व पुरेसा पाणीपुरवठा होत नसेल तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत संपूर्ण पाईपची गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील मुल्ला गल्ली येथील महिलांनी पाण्यासाठी थेट विटा नगरपरिषदेत जाऊन संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पालिकेत पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांनी खडेबोल सुनावले.

वैभव पाटील म्हणाले, शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे हे नगरपालिकेचे कर्तव्यच आहे. त्याचे संबंधित विभागाकडून पालन होताना दिसत नाही. जर कोणी आपल्या कामात चूक केली किंवा हलगर्जीपणा केल्यास त्याची गय केली जाणार नाही. घोगाववरून विटा शहराला पाणीपुरवठा होत आहे. त्याठिकाणी वीज अथवा पंपांचा काही घोटाळा झाला तरच एखादा दुसरा दिवस पाणी मागे-पुढे होऊ शकते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करावा, विटा शहराचा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असेही माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले. यावेळी नगरसेवक फिरोज तांबोळी, राहुल हजारे, संजय सपकाळ, अ‍ॅड. धर्मेश पाटील, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, भरत कांबळे, राजेंद्र जिरमे, आप्पा पाटील यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.