शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कल्पना दारिद्र्यामुळे समाजाचा नैतिक ऱ्हास

By admin | Updated: August 5, 2014 23:21 IST

कविता महाजन : पुरुषांनाच सबल करण्याची गरज

इस्लामपूर : बदलत्या समाजजीवनात महिलांनी बदलाचा वेग आत्मसात केला आहे. त्याबरोबर त्या सबलही झाल्या आहेत. मात्र त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार, बलात्काराच्या घटना पाहून, आता पुरुषांनाच सबल करण्याची गरज आहे, असे खळबळजनक विधान करीत प्रख्यात कादंबरीकार व कवयित्री कविता महाजन यांनी दारिद्र्यरेषेबरोबर आपल्याकडे कल्पना दारिद्र्याचीही रेषा आहे, त्यामुळे खऱ्या आणि वास्तववादी विकासाचे प्रतिबिंब उपेक्षित व पीडित घटकांमध्ये उमटत नाही, अशी खंत व्यक्त केली.इस्लामपूर नगरपालिकेच्यावतीने आयोजित लोकनेते राजारामबापू पाटीलनगर व्याख्यानमालेत ‘बदलते समाजजीवन व माझे लेखन’ या विषयावर कविता महाजन यांनी तिसरे पुष्प गुंफून समारोप केला. सामाजिक एकात्मता टिकली पाहिजे यासह आर्थिक आणि संगणक क्रांतीवर भारत महासत्ता बनेल, याचा आशावाद जागवणाऱ्या दोन व्याख्यानांनंतर महाजन यांनी सामाजिक जीवनातील फोफावत चाललेल्या अमानवी व्यवहारावर कोरडे ओढले.आपल्या लेखनाला वास्तवाची किनार असावी, या जाणिवेने आपण नक्षलवाद्यांच्या अड्ड्यावर, आदिवासींच्या पाड्यावर जाऊन राहिलो, असे सांगत महाजन म्हणाल्या की, तेथील कुपोषण, अनारोग्य, अन्नाचा अभाव पाहिल्यानंतर, प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधा देण्याच्या सरकारी घोषणेचे काय झाले? या भागामध्ये विकासाचे प्रचंड दुर्भिक्ष का? सरकारी योजना यांच्यापर्यंत का पोहोचत नाहीत? मग अशा विभागास महाराष्ट्र आहे का? विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी या विकासामध्ये आदिवासींचे प्रतिबिंब उमटल्याचे पाहिले का? असे विविध प्रश्न उपस्थित होतात.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी स्वागत, तर माजी नगराध्यक्षा सौ. अरुणादेवी पाटील यांनी प्रास्ताविक केले. अण्णासाहेब डांगे, विलासराव शिंदे यांचीही भाषणे झाली. डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन व परिचय करून दिला, तर नगरसेविका सौ. वैशाली हांडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)तो मला जगवत होता..!सामाजिक संस्थेमध्ये काम करीत असताना आपणही एक एड्सग्रस्त मूल दत्तक घेतले होते. त्यावेळी मला, आपण एक मूल जगवत असल्याचा अहंकार सुखावत होता. एकेदिवशी हा मुलगा तापाने आजारी पडला. त्याला औषध देऊन मी कामावर गेले. सायंकाळी परतल्यावर त्याला खायला देण्यासाठी डाळिंब सोलले. तेवढ्यात त्याने मूठभर बिया उचलल्या. त्याच्या या कृतीने मी गोंधळले. मात्र त्याचक्षणी तो माझ्या मांडीवर येऊन बसला आणि डाळिंबाच्या बिया मला भरवू लागला. त्यावेळी मी त्याला जगवते, हा अहंकार गळून पडला आणि तो मला जगवतो आहे, याची जाणीव झाली. प्रेम करायला रक्ताचं आणि सेवा करायला कायद्याचं नातं लागत नाही, हे त्यादिवशी कळालं.