शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

जत उत्तर भागात बेकायदेशीर वाळू तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:24 IST

शेगाव : जत तालुक्याच्या उत्तर भागात वाळू तस्करांनी थैमान घातले आहे. या वाळू तस्करीमुळे कोरडा नदी व वाळेखिंडी ओढापात्राची ...

शेगाव : जत तालुक्याच्या उत्तर भागात वाळू तस्करांनी थैमान घातले आहे. या वाळू तस्करीमुळे कोरडा नदी व वाळेखिंडी ओढापात्राची पूर्णतः वाट लागली आहे. नदी, ओढापात्रालगतच्या शेतकऱ्यांच्या सुमारे एक हजार पाचशे एकर शेतजमिनीवरील पिकांना धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी ट्रॅक्टरने वाळू तस्करी सुरू होती. मात्र जेसीबीच्या साहाय्याने जोरदार वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. या बेकायदेशीर वाळू तस्करांची दहशत असल्याने एकही शेतकरी तक्रार करण्यास पुढे येत नाही.

जत तालुक्याच्या उत्तर भागात वाळेखिंडी गावालगत अपूर्वाई ओढा आहे, तर कोरडा नदी ही कोसारी, शेगाव, काशिलिंगवाडी, वाळेखिंडी, बागलवाडी, सिंगनहळी या गावांच्या शेतीच्या लाभक्षेत्रात आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने या ओढा व नदीपात्रातून पाण्याच्या वेगाने काही प्रमाणात वाळूसाठा झाला आहे. या नदीपात्रालगत अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत, तर पाणी अडविण्यासाठी कोल्हापूर पद्धतीचे चार सिमेंट बंधारे आहेत. शिवाय या सहा गावांतील सुमारे एक हजार पाचशे एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत.

या परिस्थितीत वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू केला आहे. त्यामुळे पाणीसाठे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी तक्रार करूनही वाळू तस्करांवर कारवाई होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जेसीबी यंत्रामार्फत होणाऱ्या कोरडा नदी व वाळेखिंडी ओढापात्रातील बेसुमार वाळू उपशाने १० ते २० फूट खोल मोठे खड्डे पडले आहेत. हा वाळू उपसा रात्री अकरा ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुरू असल्याने महसूल विभागाला याचा थांगपत्ता काहीवेळा लागत नाही. तसेच वाळू तस्करांचे खबरे महसूल अधिकाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी गावाच्या बाहेरील प्रमुख रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने वाळू तस्करी जोमात सुरू आहे. वाळू तस्करी रोखणे हे महसूल अधिकाऱ्यापुढे एक आव्हान बनले आहे.