शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

बेकायदा उत्खननप्रश्नी बेवनूरमध्ये उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST

संख : बेवनूर (ता. जत) येथे महसूल विभागाच्या दुर्लक्षाने डी. बी. एल. कंपनीने दगड उत्खनन सुरू केले आहे. खनिकर्म ...

संख : बेवनूर (ता. जत) येथे महसूल विभागाच्या दुर्लक्षाने डी. बी. एल. कंपनीने दगड उत्खनन सुरू केले आहे. खनिकर्म विभागाकडून २५ हजार ब्रास उत्खनन परवाना असताना जादा उत्खनन केले आहे. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.

बेवनूर येथे दिलीप बिल्डकॉन कंपनीने गावापासून तीन किलाेमीटर अंतरावर कळवाल येथील नऊ एकर १० गुंठे जमीन घेऊन दगड उत्खनन सुरू केले आहे. दगडी खाणीजवळ लोकवस्ती आहे. खाणीतून बोअर ब्लास्टिंगच्या साहाय्याने खाेदकाम करीत असताना दगड बाहेर पडतात. यामुळे परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. उत्खनन क्षेत्राभोवती निकृष्ट दर्जाचे संरक्षित कुंपण घातले आहे. ते काढून चांगल्या दर्जाचे लोखंडी जाळीचे कुंपण उभारावे. लोकवस्तीमध्ये दगड येणार नाहीत यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांकडून लेखी हमीपत्र मिळावे. उत्खनन क्षेत्राशेजारी सेफ झोन सोडलेला नाही. ६ मीटरपर्यंत उत्खननाचा परवाना असताना ३० मीटरपर्यंत उत्खनन केले आहे. यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. खनिकर्म विभागाकडून २५ हजार ब्रास उत्खनन परवाना असताना जादा उत्खनन केले आहे. कंपनीने अटी-शर्तींचे पालन केलेले नाही.

या बेकायदेशीर उत्खननाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून पंचनामा करावा. दाेषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणस्थळी नायब तहसीलदार माळी यांनी भेट दिली. उपोषणात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक, बापूसाहेब शिंदे, तानाजी शिंदे, संदीप नाईक, बबन शिंदे, राजेंद्र शिंदे, भारत शिंदे, मच्छिंद्र शिंदे, राजाराम व्हनमाने, संदीप शिंदे, संभाजी शिंदे, मोहन पाटील यांनी भाग घेतला.

फोटो : १३ संख ४

ओळ : बेवनूर (ता. जत) येथे अवैध गौण खनिज उत्खनन बंद करावे, या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे.