शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

कृषी-विजय उद्यान पालिकेकडून दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:09 IST

इस्लामपूर : तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने सांगली-इस्लामपूूर रस्त्यालगत लाखो रुपये खर्च करून कृषी-विजय उद्यान उभे केले आहे. याकडे पालिका प्रशासनाने ...

इस्लामपूर : तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने सांगली-इस्लामपूूर रस्त्यालगत लाखो रुपये खर्च करून कृषी-विजय उद्यान उभे केले आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुतळे, बाग, कारंजे यांची दुरवस्था होत चालली आहे. उरुण-इस्लामपूर शहरात उरुण या भागात शेती करणारे शेतकरी जास्त प्रमाणात आहेत. याच भागातील नगरसेवकांचे वर्चस्व पालिकेवर आहे. माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी सांगली-इस्लामपूर रोडलगत कृषी-विजय उद्यान उभे आहे. या उद्यानात शेतकरी, सैनिक, शेतीला उपयोगी पडणारी अवजारे, बैलगाडी, गाय, वासरू, श्वान आदी पुतळे उभा केले आहेत. हे ठिकाण पर्यटन स्थळासारखे बनविले होते; परंतु पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्व पुतळ्यांचा रंग उडाला आहे, तर काही पुतळ्यांना भेगा पडल्या आहेत. पाण्याअभावी झाडे वाळत चालली आहेत. याकडे योग्य वेळेत लक्ष दिले नाही, तर खर्च केलेले लाखो रुपये वाया जातील.

चौकट

याठिकाणी पालिकेकडून केवळ एक महिला कर्मचारी येथे कार्यरत आहे. येथे असलेल्या पाण्याच्या नळाला २४ तास पाणी येत होते. आता केवळ तासभर पाणी येते. त्यामुळे या बगीचाला पाणीपुरवठा कमी पडत आहे. परिणामी उद्यानाची दुरवस्था झाली आहे. इस्लामपूर हायस्कूलच्या भिंतीलगत तयार केलेल्या फूटपाथ लॉनचीही दुरवस्था झाली असून, वेळीच देखभाल-दुरुस्ती न केल्यास भविष्यात ही विकासकामे नष्ट होतील.

फोेटो ०४१२२०२०-आयएसएलएम-इस्लामपूर न्यूज

सांगली-इस्लामपूर रोडलगत कृषी विजय उद्यानामधील सर्व पुतळ्याचा रंग उडाला आहे.