शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

जीवनात सत्कृत्य करायचे असेल तर सेवाभाव जागृत ठेवा

By admin | Updated: January 14, 2015 23:20 IST

प्रतीकसागरजी महाराज : कवठेएकंद येथे प्रवचन

कवठेएकंद : जीवनात सत्कृत्ये करायची असतील, तर दीनदुबळ्यांच्या सेवेमध्ये आपला वेळ घालवा, लोकांच्या सेवेत राहा, सेवाधर्म सदैव जागृत ठेवा, असा संदेश क्रांतिवीर मुनश्री १०८ प्रतीकसागरजी महाराज यांनी प्रवचनात दिला. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील सर्वधर्म सत्संग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनमालेमध्ये सकाळ सत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, जीवनात महान बनण्यासाठी महानता अंगात निर्माण केली पाहिजे. अहंकाराला काढून टाकावे लागेल. माणूस स्वत:साठी बरेच काही करतो, पण दुसऱ्यासाठी काहीच करीत नाही. दुसऱ्यासाठी सेवा करणे लाजिरवाणे वाटते. चंदनाच्या झाडाप्रमाणे वागायला शिका. प्रत्येकाची घरे पक्क्या सिमेंटची बनली आहेत. पण घरातील कुटुंबातील सदस्यांची नाती कच्ची झाली आहेत. नातीही मजबूत बनली पाहिजेत. मुले बिघडायला पालकही जबाबदार आहेत. पालकांनी कर्तव्य पार पाडताना पाल्यांकडेही लक्ष दिले पाहिजे.क्रांतिवीर प्रतीकसागर महाराज यांचे क्रांतिकारी प्रवचन ऐकण्यासाठी कवठेएकंद, नागाव कवठे, कवलापूर, नांद्रे, शिरगाव, तासगावसह बाहेरगावाहून शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली. बसवेश्वर मठाच्या प्रांगणातील सर्वधर्म सत्संग महोत्सवामुळे कवठेएकंद येथे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)‘टच’ कम हो गया है !मोबाईलचा अति वापर झाल्याने आधुनिकतेमुळे टच स्क्रीनच्या वापरामुळे घरा-घरातील व्यक्तींचा एकमेकातील ‘टच’ कमी झाला आहे. त्यामुळे कुटुंब, मित्रपरिवार, गुरु-शिष्य यांच्यातील संबंध कमकुवत बनत आहेत. हे बदलून गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा. प्रेमप्रकरणाला थारा देऊ नका. प्रेमाचा अर्थच कळलेला नाही. प्रेमात स्वार्थ, वासना नको, असे सांगून, ‘प्रेमविवाहाच्या मोहात पडणार नाही, आई-वडिलांची मान खाली घालायला लागेल असे वागणार नाही’, असा संकल्प यावेळी उपस्थित युवक-युवतींकडून करण्यात आला.