शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जीवनात सत्कृत्य करायचे असेल तर सेवाभाव जागृत ठेवा

By admin | Updated: January 14, 2015 23:20 IST

प्रतीकसागरजी महाराज : कवठेएकंद येथे प्रवचन

कवठेएकंद : जीवनात सत्कृत्ये करायची असतील, तर दीनदुबळ्यांच्या सेवेमध्ये आपला वेळ घालवा, लोकांच्या सेवेत राहा, सेवाधर्म सदैव जागृत ठेवा, असा संदेश क्रांतिवीर मुनश्री १०८ प्रतीकसागरजी महाराज यांनी प्रवचनात दिला. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील सर्वधर्म सत्संग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनमालेमध्ये सकाळ सत्रात ते बोलत होते. ते म्हणाले, जीवनात महान बनण्यासाठी महानता अंगात निर्माण केली पाहिजे. अहंकाराला काढून टाकावे लागेल. माणूस स्वत:साठी बरेच काही करतो, पण दुसऱ्यासाठी काहीच करीत नाही. दुसऱ्यासाठी सेवा करणे लाजिरवाणे वाटते. चंदनाच्या झाडाप्रमाणे वागायला शिका. प्रत्येकाची घरे पक्क्या सिमेंटची बनली आहेत. पण घरातील कुटुंबातील सदस्यांची नाती कच्ची झाली आहेत. नातीही मजबूत बनली पाहिजेत. मुले बिघडायला पालकही जबाबदार आहेत. पालकांनी कर्तव्य पार पाडताना पाल्यांकडेही लक्ष दिले पाहिजे.क्रांतिवीर प्रतीकसागर महाराज यांचे क्रांतिकारी प्रवचन ऐकण्यासाठी कवठेएकंद, नागाव कवठे, कवलापूर, नांद्रे, शिरगाव, तासगावसह बाहेरगावाहून शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली. बसवेश्वर मठाच्या प्रांगणातील सर्वधर्म सत्संग महोत्सवामुळे कवठेएकंद येथे धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. (वार्ताहर)‘टच’ कम हो गया है !मोबाईलचा अति वापर झाल्याने आधुनिकतेमुळे टच स्क्रीनच्या वापरामुळे घरा-घरातील व्यक्तींचा एकमेकातील ‘टच’ कमी झाला आहे. त्यामुळे कुटुंब, मित्रपरिवार, गुरु-शिष्य यांच्यातील संबंध कमकुवत बनत आहेत. हे बदलून गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा. प्रेमप्रकरणाला थारा देऊ नका. प्रेमाचा अर्थच कळलेला नाही. प्रेमात स्वार्थ, वासना नको, असे सांगून, ‘प्रेमविवाहाच्या मोहात पडणार नाही, आई-वडिलांची मान खाली घालायला लागेल असे वागणार नाही’, असा संकल्प यावेळी उपस्थित युवक-युवतींकडून करण्यात आला.