शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दबाव आणाल तर रस्त्यावर उतरू

By admin | Updated: January 16, 2015 23:43 IST

पाच गावांचा इशारा : डफळापूर योजनेप्रश्नी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

कवठेमहांकाळ : डफळापूरच्या राष्ट्रीय पेयजल योजनेला बसाप्पाचीवाडी तलावातून पाणी उचलण्यास पाच गावांतील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून प्रशासन दबावाने पाणी नेणार असेल तर या गावातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा या गावांतील शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ तहसीलदारांना आज शुक्रवारी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच काही कार्यकर्ते या योजनेच्या पाण्याला लोकशाही मार्गाने विरोध करताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. हा प्रयत्नही हाणून पाडू, असे निवेदनात म्हटले आहे.डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी बसाप्पाचीवाडी तलावातून पाणी नेण्यास बसाप्पाचीवाडी, इरळी, मोघमवाडी, कोकळे आणि जत तालुक्यातील अंकले या ग्रामपंचायतींनी एका ठरावाद्वारे विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या पाण्याला पाच गावांतून मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सध्या बेकायदेशीररित्या राष्ट्रीय पेयजलचे काम चालू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही प्रशासन राजकीय दबावाला बळी पडून काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना निर्माण होत आहेत. पाण्याचा वाद न्यायालयात असताना काम सुरू करणे, न्यायाविरोधी आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाला आम्ही बांधिल आहोत, असेही निवेदनात म्हटले आहे.डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजनेला लोकशाही मार्गाने शासनाचे दरवाजे ठोठावणाऱ्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडत आहेत. हेही अन्यायकारक आहे. कार्यकर्त्यांना पोलिसी बळ दाखवून त्रास दिला तर या पाच गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी बसाप्पाचीवाडी येथे शेतकरी आणि कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रशासनाच्या अन्यायाविरुध्द भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाणी न देण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या बैठकीस शेकडो ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. (वार्ताहर)डफळापूर : डफळापूर (ता. जत) येथील पाणी योजनेचे काम बसाप्पाचीवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवार दि. १८ पासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे. काम बंद पाडणाऱ्या बसाप्पाचीवाडी येथील सहा ग्रामस्थांना कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. डफळापूर राष्ट्रीय पेयजल योजना बसाप्पाचीवाडी तलावातून होऊ नये म्हणून बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. अशा परिस्थितीत डफळापूर योजनेचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी या योजनेसाठी पाठपुरावा केला. दि. ३ जानेवारी रोजी पोलीस बंदोबस्तात बसाप्पाचीवाडी तलावात व परिसरात चर खोदणे व जलवाहिनीचे काम सुरू केले. सहा दिवस काम करण्यात आले. सहा दिवसात दोन वेळा बसाप्पाचीवाडी येथील ग्रामस्थांनी काम बंद पाडले. जमावापुढे कवठेमहांकाळ पोलिसांचे काही चालले नाही. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली. याच्या निषेधार्थ दि. १० रोजी डफळापूरमध्ये बंद पाळण्यात आला. सुनील चव्हाण यांनी ग्रामस्थांवर कारवाईसाठी कवठेमहांकाळ पोलिसात फिर्याद दिली. कवठेमहांकाळ पोलिसांनी भारत ज्ञानदेव ओलेकरसह सहाजणांवर अटकेची कारवाई केली. डफळापूर व बसाप्पाचीवाडी या दोन्ही गावात पाणीप्रश्नावरून संघर्ष पेटला असताना, समझोता करण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख यांनी पुढाकार घेऊन डफळापूरचा कायमस्वरुपी पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे. परंतु अद्याप कोणीही अधिकाऱ्यांनी समझोत्याबाबत पुढाकार घेतलेला नाही. यामुळे डफळापूर ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)