शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

चूक झाली तर गाठ माझ्याशी

By admin | Updated: June 17, 2016 00:24 IST

अजित पवार : तासगावात आबांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

तासगाव : आबांचे काम मोठे आहे. याचा विसर पडू देऊ नका. सामान्य जनता आपल्यासोबत आहे. तिकीट देताना सर्वांना सामावून घ्या. जनमानसात चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता राष्ट्रवादीच्याच पाठीशी राहील. आबांच्या नावाला साजेसे काम करा, चूक झाली तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना दिला. तासगाव येथे बाजार समितीच्या आवारात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन आणि बाजार समितीच्या बेदाणा सेल हॉलचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते झाले. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील उपस्थित होते. पवार म्हणाले की, आबांनी राजकारणात कधीही निष्ठा सोडली नाही. मात्र त्यांच्या पश्चात काहींनी पक्ष सोडला. त्यांच्या पश्चात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. नगरपालिका निवडणुकीत चांगल्या विचारी माणसांना संधी द्या. कोणी कितीही प्रलोभन दाखवले, दमदाटी केली तरी, ही माणसे सोबत राहायला हवीत. आबांच्यासोबत सर्व जाती-धर्माची माणसे होती. सर्व समाजाला सामावून घेऊन, महिला, तरुण, अनुभवी लोकांना तिकिटे द्या. सुमनतार्इंच्या नेतृत्वाखाली निवडणुकांना सामोरे जा. ते म्हणाले की, दुष्काळावरुन लक्ष हटविण्यासाठी पाऊस येणार म्हणून वावड्या उठविल्या जात आहेत. बाजार समित्या मोडीत काढून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे उद्योग सरकारकडून सुरु आहेत. साखरेवर निर्यातबंदी घालून ऊस उत्पादकांना अडचणीत आणले जात आहे. शेतकरी दुष्काळात होरपळत असताना कर्जमाफी दिली जात नाही. उद्योगांना मात्र सवलती दिल्या जातात. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असे यांनाच विचारण्याची वेळ आली आहे.शशिकांत शिंंदे म्हणाले की, अधिकारी खुर्चीत बसल्यानंतर लगेचच बदलीचे पत्र हातात दिले जाते. असा कारभार सध्याच्या सरकारमध्ये सुरू आहे. पक्षातून कोण गेले, कोण आले, यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत ताकद दाखवून द्या. यावेळी स्मिता पाटील, दिनकरदादा पाटील, बेदाणा व्यापारी अशोक बाफना यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर उपसभापती सतीश झांबरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)+विरोधकांच्या : दमबाजीचा समाचारकायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्याची, दमदाटीची भाषा काही नेत्यांकडून वापरली जात असेल. मात्र काहींच्या फक्त तोंडात दम असतो. आपण कोणाच्या नादी लागायचे नाही अन् कोणी आपल्या वाटेला आला, तर सोडायचे नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी तालुक्यातील विरोधकांचा समाचार घेतला. तत्पूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिनकरदादा पाटील यांनी, बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या प्रसंगात कोणीही मदत केली नसल्याची खंत व्यक्त करुन, ग्रामपंचायतीसह अन्य निवडणुकांत गुंडगिरी करुन जिंकण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनीही, जिल्ह्यात सत्तेच्या जोरावर विरोधकांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दडपशाहीचे राजकारण सुरु असल्याचा आरोप केला होता.खासदार, आमदार झोपा काढतायत काय?युतीचे पाच आमदार आणि एक खासदार असताना, जिल्ह्यातील पाणी योजना सहा महिने बंद राहतात. मग तुम्ही सत्तेत कशासाठी आहात? जिल्ह्याचा पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्याचा. तो किती लक्ष देणार? पाणी योनजांची कार्यालये विदर्भात गेली तरी हे सत्ताधारी आमदार, खासदार झोपा काढतायत का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.