शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची नवी खेळी! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
2
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
3
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
4
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
5
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
6
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
7
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
8
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
9
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
10
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
11
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
12
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
14
हे रिअल शिंदे आहेत का? भर सभागृहात दुसरीत शिकणाऱ्या मुलीचा पालकांना प्रश्न, नेमके काय घडले?
15
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
16
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
17
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या
18
सेक्स, ड्रग्ज, ब्लॅकमेलिंग...मस्क यांना अडकवण्याचा कट; माजी FBI अधिकाऱ्याचा दावा
19
२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
20
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी

पूरग्रस्तांचे पैसे द्यायचे नसतील तर पायातले हातात का घेऊ नये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : उसाला १३५ रुपये आणि सोयाबीनला प्रतिगुंठा ६८ रुपये देऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा करताना या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : उसाला १३५ रुपये आणि सोयाबीनला प्रतिगुंठा ६८ रुपये देऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा करताना या सरकारला लाज वाटली पाहिजे. आमचे पैसे द्यायचे नसतील तर पायातले हातात का घेऊ नये?, अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर मंगळवारी हल्ला चढविला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील पूर येऊ नये म्हणून भिंत बांधू, बोगदे काढू, जतच्या दुष्काळी भागाला पाणी पाजू अशा कविकल्पना करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

येथील प्रांत कार्यालयावर वाळवा, शिराळा तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा शेट्टी, माजी आमदार शिवाजीराव नाईक, नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. तेथे सभेनंतर उसाचे १३५ रुपये आणि सोयाबीनचे ६८ रुपये अशी दोन पाकिटे करून ती निवेदनासोबत प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

शेट्टी म्हणाले की, पूर ओसरून महिना झाला तरी सरकार मदत देत नाही. जयंतराव म्हणतात, यांच्या मागण्या काय आहेत, ते माहीत नाही. कधी भिंत आणि बोगदा बांधायचा तो बांधा; त्याअगोदर आमच्या बुडाखाली शिरलेल्या पाण्याचे बघा. केंद्राकडून पैसे येणार आहेत म्हणून तिकडे बोट दाखवू नका. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी केंद्राविरुद्ध आंदोलन करावे. त्यामध्ये आम्ही सोबत असू.

नाईक म्हणाले, मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी पुराची फक्त पाहणी केली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी अद्याप मदत दिलेली नाही.

निशिकांत पाटील म्हणाले, २५ वर्षे मंत्री असूनही या भागातील प्रश्न शिल्लक राहिले आहेत. पुराबाबत असंवेदनशील असणारे मंत्री म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहावे लागेल. प्रशासनाला पुढे करून सामान्य कार्यकर्त्यांना पुढे करून त्रास दिला जात आहे. यापुढे त्याचा हिशेब चुकता केला जाईल.

यावेळी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, पृथ्वीराज पवार, पोपटराव मोरे, ॲड. एस. यू. संदे, महेश खराडे, रणधीर नाईक, सनी खराडे, शाकीर तांबोळी, प्रसाद पाटील, धैर्यशील मोरे, भागवत जाधव, संदीप राजोबा, सुखदेव पाटील, अक्षय पाटील उपस्थित होते.

चौकट

सरकारला १ सप्टेंबरपर्यंत मुदत

शेट्टी म्हणाले, येत्या १ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफीचा अध्यादेश, पूरग्रस्तांचे विनाअट पुर्नवसन, नियमित कर्जदाराला ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान, पूरग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफी, कणेगावचे पुनर्वसन, या मागण्या मान्य न झाल्यास नरसोबावाडीच्या संगमावर हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने जलसमाधी घेऊ.