शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

एफआरपीत बदल केल्यास रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

सांगली : केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितापेक्षा साखर कारखानदारांचे हित पाहण्यास प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांनी उसाला मिळणाऱ्या ...

सांगली : केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितापेक्षा साखर कारखानदारांचे हित पाहण्यास प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांनी उसाला मिळणाऱ्या एफआरपीमध्ये बदल करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयास आमचा तीव्र विरोध असून, राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटना सहकार संघटनेचे प्रमुख संजय कोले यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, ऊस व्यवसायातील विविधप्रश्नी शासनाने साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने उसाचा अंतिम भाव राज्यांनी पक्का करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे २०२०-२१ चा हंगाम संपत आल्याने या हंगामात शेतकऱ्यांनी गळितासाठी दिलेल्या उसाचा अंतिम दर ठरवणेे गरजेचे आहे. केंद्राचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम तीन मधील उपकलम तीनमध्ये ऊस विकणारा व ऊस खरेदी करणारा यांच्यात करार झाला असेल, तर करारानुसार उसाची पहिली उचल द्यावी व करार नसेल, तर एफआरपीनुसार ऊस घातल्यापासून १४ दिवसांत द्यावी, असे म्हटले आहे.

सध्या कारखानदार ऊस नोंदवून घेतानाच उसाची किंमत टप्प्यात देण्याचे शेतकऱ्यांकडून लेखी घेत आहेत. खरेतर ऊस नोंदणी व पैसे देण्याचा करार वेगवेगळा असावा, असे साखर आयुक्तांचे आदेश आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, हे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय, कारखाना सभासद व शेतकऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे. एफआरपी ठरवताना ज्या मुद्द्याचा विचार केला जातो. त्यात साखर दराचा विचारही केला जातो. मात्र उसाचे किमान मूल्य ठरवताना उसाचा उत्पादन खर्च भरून निघावा, हा महत्त्वाचा हेतू आहे. कारखान्याला ऊस देण्याअगोदर शेतकऱ्याने गुंतवणूक करून जोखीम घेतलेली असते. एफआरपी कायदेशीर आहे. त्यात केंद्र अथवा राज्याने जर बदल करण्याचा प्रयत्न केला, तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ऊस पिकवण्यात नुकसान होऊ लागल्यास शेतकरी उसाऐवजी दुसऱ्या पिकाकडे वळतील. त्यामुळे साखर दराप्रमाणे उसदरात बदल केल्यास कारखान्याना ऊस मिळण्यात अडचणी येतील.

महाराष्ट्रातील दिग्गज कारखानदार अडचणीत येतील, म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने एफआरपीमध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संजय कोले यांनी दिला.