शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

एफआरपीत बदल केल्यास रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST

सांगली : केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितापेक्षा साखर कारखानदारांचे हित पाहण्यास प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांनी उसाला मिळणाऱ्या ...

सांगली : केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितापेक्षा साखर कारखानदारांचे हित पाहण्यास प्राधान्य दिले आहे. म्हणूनच त्यांनी उसाला मिळणाऱ्या एफआरपीमध्ये बदल करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयास आमचा तीव्र विरोध असून, राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटना सहकार संघटनेचे प्रमुख संजय कोले यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, ऊस व्यवसायातील विविधप्रश्नी शासनाने साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने उसाचा अंतिम भाव राज्यांनी पक्का करावा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे २०२०-२१ चा हंगाम संपत आल्याने या हंगामात शेतकऱ्यांनी गळितासाठी दिलेल्या उसाचा अंतिम दर ठरवणेे गरजेचे आहे. केंद्राचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम तीन मधील उपकलम तीनमध्ये ऊस विकणारा व ऊस खरेदी करणारा यांच्यात करार झाला असेल, तर करारानुसार उसाची पहिली उचल द्यावी व करार नसेल, तर एफआरपीनुसार ऊस घातल्यापासून १४ दिवसांत द्यावी, असे म्हटले आहे.

सध्या कारखानदार ऊस नोंदवून घेतानाच उसाची किंमत टप्प्यात देण्याचे शेतकऱ्यांकडून लेखी घेत आहेत. खरेतर ऊस नोंदणी व पैसे देण्याचा करार वेगवेगळा असावा, असे साखर आयुक्तांचे आदेश आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, हे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालय, कारखाना सभासद व शेतकऱ्यांनी पाहणे गरजेचे आहे. एफआरपी ठरवताना ज्या मुद्द्याचा विचार केला जातो. त्यात साखर दराचा विचारही केला जातो. मात्र उसाचे किमान मूल्य ठरवताना उसाचा उत्पादन खर्च भरून निघावा, हा महत्त्वाचा हेतू आहे. कारखान्याला ऊस देण्याअगोदर शेतकऱ्याने गुंतवणूक करून जोखीम घेतलेली असते. एफआरपी कायदेशीर आहे. त्यात केंद्र अथवा राज्याने जर बदल करण्याचा प्रयत्न केला, तर शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ऊस पिकवण्यात नुकसान होऊ लागल्यास शेतकरी उसाऐवजी दुसऱ्या पिकाकडे वळतील. त्यामुळे साखर दराप्रमाणे उसदरात बदल केल्यास कारखान्याना ऊस मिळण्यात अडचणी येतील.

महाराष्ट्रातील दिग्गज कारखानदार अडचणीत येतील, म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने एफआरपीमध्ये काहीही बदल करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही संजय कोले यांनी दिला.