शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला बाजारात विकणारच नसेल, तर पिकवायचा कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:29 IST

सांगली : बाजारात विकणारच नसेल, तर पिकवायचं कशासाठी, असा सवाल करत शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळांच्या उत्पादनाला तूर्त विश्रांती दिली ...

सांगली : बाजारात विकणारच नसेल, तर पिकवायचं कशासाठी, असा सवाल करत शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळांच्या उत्पादनाला तूर्त विश्रांती दिली आहे. लॉकडाऊनमुळे सव्वा वर्षे बाजार बंद आहेत, त्यामुळे ऊसासारख्या अन्य पिकांना पसंती दिली आहे.

मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकतो. तो पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद आदी शहरांना पाठवला जातो. ढबू मिरची, बेबी कॉर्न, परदेशी भाज्यांची निर्यात मोठी आहे. गेले सव्वा वर्ष देशभरातील बाजार बंद असल्याने निर्यात थांबली आहे.

कोथिंबीर, मेथी, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, काकडी, वांगी या कमी दिवसांत पैसा मिळवून देणाऱ्या भाज्या हजारो एकरात केल्या जातात. मिरज तालुक्यात लिंगनूर, चाबुकस्वारवाडी, बेळंकी, जानराववाडी या सीमाभागातील गावांत प्रत्येक शेतकरी किमान गुंठाभर तरी भाज्या पिकवतो; पण लॉकडाऊनमध्ये भाजीपाला फेकून द्यावा लागला. टोमॅटो, कलिंगडे, वांगी रस्त्याकडेला कुजली. जनावरांनाही घातली. कोरोना संपण्याची निश्चिती नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे प्लॉट रिकामेच ठेवले. उन्हाळी भाज्या यंदा दिसल्याच नाहीत. फक्त कांदा, बटाटा, कोबी व ढबू मिरची बाजारात उपलब्ध झाली.

चौकट

ऊस, द्राक्षाचा मार्ग सुकर

द्राक्षाचे सलग दोन हंगाम लॉकडाऊनमध्ये येऊनही सुखरूप निसटले. गतवर्षी हंगाम संपतेवेळी कोरोनाने उचल खाल्ली. यंदादेखील जानेवारी ते एप्रिलपर्यंत कोरोना सौम्य होता, त्यामुळे हंगाम पार पडला. ऊसालादेखील अडचण आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रिकामी राने ऊस, द्राक्षाखाली घेतली आहेत.

चौकट

यांचे उत्पादन रोडावले

भाजीपाला, फळभाज्या, फळे यांचे उत्पादन रोडावले आहे. मोठ्या शहरांत जाणाऱ्या ढबू, कोबी, फ्लॉवरचे फड रिकामे आहेत. स्थानिक बाजारपेठेतील वांगी, दोडका, कारली यांना विश्रांती मिळाली आहे. शेती उसाखाली घेऊन शेतकरी बाजारपेठ सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कोट

कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भाजीपाल्याचे उत्पन्न हमखास पैसा देणारे ठरते. लॉकडाऊनमध्ये मंडई, आठवडी बाजार बंद असल्याने भाज्या विकल्या गेल्या नाहीत. त्यांचे खत करावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्त भाजीपाल्याला विश्रांती दिली आहे.

- दादासाहेब काळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, चाबुकस्वारवाडी