शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

वीज तोडायला कोणी आले तर त्याचे हात-पाय तोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : राज्य सरकारने राज्यातील वीजग्राहकांना वीज बिल माफीचे दिलेल्या आश्वासनाला हरताळ फसलेला आहे. ‘महावितरण’च्या कंपनीने नोटीस, फोनद्वारे नागरिकांना ...

इस्लामपूर : राज्य सरकारने राज्यातील वीजग्राहकांना वीज बिल माफीचे दिलेल्या आश्वासनाला हरताळ फसलेला आहे. ‘महावितरण’च्या कंपनीने नोटीस, फोनद्वारे नागरिकांना तत्काळ वीज बिल भरावे. अन्यथा वीज कनेक्शन तोडू अशी खुलेआम धमकीसुत्र सुरू आहे. ते तत्काळ थांबवावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वीजपुरवठा तोडायला जर कोणी आले तर त्याचे हात पाय तोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.

जाधव म्हणाले, सांगली जिल्हात कोरोनाच्या काळात राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. ६ ते ७ माहिन्यांच्या काळात रोजीरोटीच गेल्याने गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांची मोठी आर्थिक दमछाक झाली. या काळात संपूर्ण उद्योग बंद पडले. शेतकऱ्याचा माल सडून गेला. देशातीत केरळ, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात ५० टक्के घरगुती बिलामध्ये सवलत दिली आहे. पण प्रगत महाराष्ट्र सरकाराने अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.

राज्य सरकारकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यानी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ, असे सांगून जनतेची फसवणूक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट देऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली. लॉकडाऊन काळात ३०० ते ४०० युनिटपर्यंत वीजग्राहकांना माफी द्यावी, ही संघटनेची मागणी असताना वीज वितरण कंपनीकडून वीज तोडू, असे वारंवार सांगितले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर राहील. ‘महावितरण’ची धमकी कदापि खपवून घेतली जाणार नाही.