शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

वीज तोडायला कोणी आले तर त्याचे हात-पाय तोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : राज्य सरकारने राज्यातील वीजग्राहकांना वीज बिल माफीचे दिलेल्या आश्वासनाला हरताळ फसलेला आहे. ‘महावितरण’च्या कंपनीने नोटीस, फोनद्वारे नागरिकांना ...

इस्लामपूर : राज्य सरकारने राज्यातील वीजग्राहकांना वीज बिल माफीचे दिलेल्या आश्वासनाला हरताळ फसलेला आहे. ‘महावितरण’च्या कंपनीने नोटीस, फोनद्वारे नागरिकांना तत्काळ वीज बिल भरावे. अन्यथा वीज कनेक्शन तोडू अशी खुलेआम धमकीसुत्र सुरू आहे. ते तत्काळ थांबवावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वीजपुरवठा तोडायला जर कोणी आले तर त्याचे हात पाय तोडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिला.

जाधव म्हणाले, सांगली जिल्हात कोरोनाच्या काळात राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. ६ ते ७ माहिन्यांच्या काळात रोजीरोटीच गेल्याने गरीब, कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांची मोठी आर्थिक दमछाक झाली. या काळात संपूर्ण उद्योग बंद पडले. शेतकऱ्याचा माल सडून गेला. देशातीत केरळ, मध्यप्रदेश, गुजरात राज्यात ५० टक्के घरगुती बिलामध्ये सवलत दिली आहे. पण प्रगत महाराष्ट्र सरकाराने अद्याप निर्णय घेतलेला नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.

राज्य सरकारकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यानी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ, असे सांगून जनतेची फसवणूक केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट देऊन शेतकऱ्यांची कैफियत मांडली. लॉकडाऊन काळात ३०० ते ४०० युनिटपर्यंत वीजग्राहकांना माफी द्यावी, ही संघटनेची मागणी असताना वीज वितरण कंपनीकडून वीज तोडू, असे वारंवार सांगितले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर राहील. ‘महावितरण’ची धमकी कदापि खपवून घेतली जाणार नाही.