शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

लसीकरणाची गती अशीच राहिली तर जिल्ह्याला पाच वर्षेही पुरणार नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:15 IST

सांगली : जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले असले तरी ते अद्याप पहिल्या टप्प्यातच आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता शासकीय कर्मचारी व ...

सांगली : जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले असले तरी ते अद्याप पहिल्या टप्प्यातच आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता शासकीय कर्मचारी व पोलिसांना लस टोचली जात आहे, शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांचा दुसरा टप्पाही १६ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. लसीकरणाची गती पाहता जिल्ह्याच्या सुमारे ३२ लाख लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी तर पाच वर्षेही पुरणार नाहीत अशी स्थिती आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे ८०,३३० डोस आतापर्यंत मिळाले आहेत, त्यातील ५१,३६० डोस लसीकरणासाठी वितरीत झाले आहेत. आणखी काही डोस येत्या आठवड्यात येणार आहेत. लसीकरणासाठी २९ हजार ९०० जणांची नोंद झाली आहे, पण दररोजचे सरासरी लसीकरण ५०० ते ६०० इतकेच आहे. आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर्स यांच्यापर्यंतच सध्या लस उपलब्ध आहे. सामान्य लोकांसाठी मार्चनंतर उपलब्धतेची शक्यता आहे. लसीकरणाची गती अशीच मंद राहिली तर संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण करायला पाच वर्षेही पुरणार नाहीत अशी स्थिती आहे. त्यातच पहिल्या लसीकरणानंतर २८ दिवसांनी दुसरा डोसही घ्यावा लागणार आहे. हा विचार करता जिल्ह्याला लसीकरणामध्ये अद्याप बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे हे स्पष्ट आहे.

लसीकरणामध्ये सुरुवातीला ॲपमधील तांत्रिक दोष अडथळा ठरले, आता लोकांची नकारात्मक मानसिकता आडवी येत आहे. कोरोना संपला, आता कशाला लस पाहिजे, अशी मानसिकताही तयार झाली आहे.

पॉईंटर्स

जिल्ह्यात दररोज दिली जाणारी लस - सरासरी ५५०

आतापर्यंत झालेले लसीकरण - १८३९१

दररोज केंद्रनिहाय लस -

सांगली सिव्हिल - ८०

मिरज सिव्हिल - ६०

भारती रुग्णालय - ११०

इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय - ६९

तासगाव ग्रामीण रुग्णालय - ६०

जत ग्रामीण रुग्णालय - ५५

कडेगाव ग्रामीण रुग्णालय - १०

आष्टा ग्रामीण रुग्णालय - ६१

आटपाडी ग्रामीण रुग्णालय - ६०

विटा ग्रामीण रुग्णालय - ५५

शिराळा उपजिल्हा रुग्णालय - ५५

कवलापूर आरोग्य केंद्र - १२६

पलूस आरोग्य केंद्र - ३६

चौकटलस मुबलक, घेणारेच पाहिजेत !

जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असला तरी लसीकरणाचा वेग अपेक्षेप्रमाणे नाही. आरोग्य यंत्रणेसह महसूल व पोलीस यंत्रणेतील लाभार्थीही लस घेण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. ॲलर्जी आहे, आजारी आहे, मधुमेह-रक्तदाबाचा विकार आहे अशा अनेक कारणे सांगून लसीकरण टाळण्याकडे कल दिसतो. त्यामुळे नोंदणी झाल्याप्रमाणे लसीकरण होईन झाले आहे. दुसरा डोस सुरू झाला तरी पहिल्या टप्प्यातील नोंदणीच्या १०० टक्के लसीकरण होऊ शकले नाही. लसीच्या परिणामांची नाहक भीती मनात ठाण मांडून आहे.

चौकट

दहा दिवसांत ११४ रुग्ण वाढले

गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात ११४ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यातील सर्वाधिक म्हणजे २४ रुग्ण १० फेब्रुवारीस आढळले. जिल्ह्याची दररोजची सरासरी रुग्णसंख्या दहापर्यंत आहे. लसीकरण सुरू असले तरी रुग्णवाढीचा वेगही फारसा नाही. त्यामुळेच लोकांचा आत्मविश्वास वाढला असून, लसीकरणाकडे ते पाठ फिरवत आहेत.

कोट

लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात नोंदणी झालेल्या सर्वांचेच लसीकरण होऊ शकले नाही. प्रतिसाद वाढावा यासाठी प्रयत्न करत आहोत. लस सुरक्षित असून, सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती टोचून घेतली आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोविन ॲपमधील दोषांचेही निराकरण झाले आहे, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लाभार्थींनी निशंकपणे पुढे यावे.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी