शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

महापौर समस्या घेऊन येतच नाहीत, तर निधी कसा देणार?--सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:11 IST

सांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्'ाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत.

ठळक मुद्दे निधी अडविणे ही भाजपची संस्कृती नाहीआमचे आमदार काम करतात अडचणी त्यांनी सांगितल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न मला कसे कळतील?, खीळ घालण्याचा प्रयत्न;

सांगली : आम्ही पक्ष, राजकारण बाजूला ठेवून राज्याचा आणि प्रत्येक जिल्'ाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत. मी पालकमंत्री झाल्यापासून एकदाही सांगलीचे महापौर विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. तर त्यांना निधी कुठून मिळणार, असा सवाल पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला. उलट भाजपचे आमदार शहरात कामे करीत असताना, त्यांनाही खीळ घालण्याचे काम महापालिकेतील सत्ताधारी करीत आहेत, अशी टीका त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर केली. निधी अडविणे ही भाजपची संस्कृती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगलीत शुक्रवारी आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलत होते. सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रश्न विचारला असता, देशमुख म्हणाले की, सांगली, मिरज शहराच्या विकासाकडे कधीच आम्ही दुर्लक्ष केले नाही. विकास कामात राजकारण आणण्याची भाजपची रणनीतीच नाही. मी सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही महापालिकेचे महापौर, पदाधिकारी विकास कामे घेऊन माझ्याकडे आले नाहीत. मी तर शहराचा विकास करण्यासाठी अनेक योजनांचे नियोजन करत आहे. शहरातील समस्या घेऊन महापौर माझ्याकडे आले, तर निश्चितच ती विकास कामे मार्गी लावण्यात येतील. महापौरांनाच शहरातील प्रश्न सोडवायचे नसतील, तर आम्ही त्याला काय करणार?, असा टोलाही देशमुख यांनी महापालिकेतील सत्ताधाºयांना लगावला.

ते म्हणाले की, विकास कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे निधीची कोणतीही अडचण नाही. सांगली शहरात आमदार सुधीर गाडगीळ, मिरज शहरात आमदार सुरेश खाडे विकास कामे घेऊन शासनाकडे जातात. त्यासाठी लागणारा निधी खेचून आणतात. पण, याला महापालिकेतील सत्ताधाºयांकडून हवे तेवढे सहकार्य मिळत नसल्याची टीकाही देशमुख यांनी केली.दिवाळीपूर्वी शेतकºयांना कर्जमाफीचे पैसे मिळणारकर्जमाफीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी आम्ही पुन्हा कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आठ ते दहा दिवसात अर्जांची छाननी आणि सोशल आॅडिट करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यासाठी महसूल, सहकार विभागाच्या अधिकाºयांना रात्रीचा दिवस करून कामे पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आॅक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होतील, असा विश्वासही सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.उद्योग वाढीला उद्योजकांचेही प्रयत्न हवेतसांगलीचा औद्योगिक विकास वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पण, यासाठी उद्योजकांनीही काही प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्या समस्या, नवीन प्रकल्प याबाबत सूचना आणि प्रस्ताव देण्याची गरज आहे. मीही उद्योजक आहे. पण, सांगलीचा पालकमंत्री झाल्यापासून एकदाही उद्योजक माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले नाहीत. त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्याच नाहीत, तर त्यांचे प्रश्न मला कसे कळतील?, असा टोलाही सुभाष देशमुख यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला लगावला.