शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

होम आयसोलेशन बंद केले तर साडेदहा हजार रुग्णांना घराबाहेर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:28 IST

सांगली : सांगली जिल्ह्यात होम आयसोलेशनवर निर्बंधांचा निर्णय शासनाने घेतल्याने अकरा हजार रुग्णांना घराबाहेर काढावे लागणार आहे. त्यांच्यासाठी गावोगावी ...

सांगली : सांगली जिल्ह्यात होम आयसोलेशनवर निर्बंधांचा निर्णय शासनाने घेतल्याने अकरा हजार रुग्णांना घराबाहेर काढावे लागणार आहे. त्यांच्यासाठी गावोगावी संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करावी लागणार आहेत.

राज्यातील १५ जिल्ह्यांत कोरोनाची तीव्रता जास्त असल्याने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय मंगळवारी झाला, त्यात सांगलीचाही समावेश आहे. जिल्ह्यात मंगळवारअखेर १३ हजार २४९ सक्रिय रुग्ण असून, त्यातील १० हजार ४२५ घरगुती विलगीकरणात आहेत. त्यांच्यावर शंभर टक्के नियंत्रण नसल्याने सुपर स्प्रेडर ठरत आहेत. त्यांची रवानगी आता संस्थात्मक विलगीकरणात केली जाईल.

पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱ्या लाटेत गावोगावी केंद्रे सुरू झाली नाहीत. रुग्ण घरातच राहिले. सर्रास घरात स्वतंत्र खोल्या, स्वच्छतागृह नसल्याने संपूर्ण कुटुंबे बाधित झाली. गावातही फैलाव झाला. कोरोनाचा आलेख वाढला. कोरोना रोखण्यासाठी दक्षता समित्यांनी सक्रिय होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी वेळोवेळी केले आहे. प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या घरावर फलक लावणे, मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करणे, हाय रिस्क काँटॅक्ट शोधणे अशी कामे झाली नाहीत. त्यामुळे घरगुती विलगीकरण बंद करून रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

चौकट

खर्च १५ व्या वित्त आयोगातून

काही ग्रामपंचायतींनी विलगीकरण केंद्रासाठी पैसे कोठून आणणार, असा प्रश्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे उपस्थित केला होता. शासनाने १५ व्या वित्त आयोगातून खर्चाला मंजुरी दिल्याने पेच सुटला आहे.

चौकट

मंगळवारअखेर सक्रिय रुग्णसंख्या - १३,२४९

घरगुती विलगीकरणातील रुग्ण - १०,४२५

महापालिका क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील रुग्ण - १७१

ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील रुग्ण - ३०३

कोट

पहिल्या लाटेत गावोगावी कम्युनिटी सेंटर्स सुरू होती. त्याच धर्तीवर यावेळेस संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करणे अपेक्षित आहे. शासनाने होम आयसोलेशन बंदचा निर्णय घेतला असला तरी मार्गदर्शक सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत. होम आयसोलेशन बंद केल्याने कोरोना नियंत्रणात आणण्यात मदत होणार आहे.

- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

कोट

शाळा इमारती किंवा शासकीय इमारतीत संस्थात्मक विलगीकरण केंद्रे सुरू करता येतील. त्यासाठी फार खर्च येणार नाही. खर्चाविषयक ग्रामपंचायतीची शंका निरर्थक आहे. रुग्णाला कुटुंबातूनच जेवण देता येऊ शकते. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण केंद्रांसाठी गावांनी पुढाकार घेतला पाहिजे.

- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी