शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

गावाच्या गरजा ओळखून त्या सोडविण्याचे प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : गावाच्या गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुसाईवाडीत या पद्धतीने गावाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरूड : गावाच्या गरजा ओळखून त्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुसाईवाडीत या पद्धतीने गावाची वाटचाल सुरू असल्याचा आनंद वाटला, असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे- पाटील यांनी केले.

ते कुसाईवाडी (ता. शिराळा) येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सरपंच विनोद पन्हाळकर, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, डॉ. दिनकर झाडे, डॉ. इंद्रजित यमगर यांची प्रमुख उपस्थिती होती. पेरे-पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीने गावांसाठी स्वच्छ पाणी पुरवठा योजना राबवावी. सांडपाणी व्यवस्था करावी. गावातील मोकळ्या जागेत फळझाडे लावली पाहिजेत. रस्ते, गाव परिसर स्वच्छ ठेवावा. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तसेच गावातील निराधार लोकाच्या जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. पैसा असेल तरच विकास होतो. हे चुकीचे आहे. गावचा विकास करताना सर्वांनी एकत्र आले पाहिजे. प्रत्येक माणसाने गावांसाठी, देशासाठी काही तरी योगदान दिले पाहिजे.

याप्रसंगी बिळाशी नवनिर्माणतर्फे भास्करराव पेरे पाटील यांचा सत्कार डॉ. दिनकर झाडे, डॉ. संध्या झाडे, आनंदा लोहार यांच्यासह बिळाशीतील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. काेरोना काळात विशेष योगदान देणाऱ्या डॉ. इंद्रजित यमगर, डॉ. गायत्री यमगर, अमोल देसाई, तानाजी पवार यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संध्या झाडे, डॉ. गायत्री यमगर, पोलीस पाटील भगवान येडगे, ग्रामसेवक एस. ए. पाटील, ग्रामपंचात सदस्य आनंदा भुरके, बाजीराव खोत, शेतकरी संघटनेचे देवेंद्र धस, आनंदा लोहार, रामचंद्र मुदगे, प्रतापराव शिंदे, सुनील पन्हाळकर, गोरख पवार, सचिन यादव, प्रदीप मुदगे, रोहित मुदगे, दीपक खोत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दीपक खोत यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब परीट यांनी स्वागत केले. सरपंच विनोद पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले, तर गोरख पवार यांनी आभार मानले.