शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूरचा विकास आणि निधीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि सत्ताधारी विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : इस्लामपूरचा विकास आणि निधीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि सत्ताधारी विकास आघाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यात संघर्षमय कलगीतुरा रंगला आहे. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने ३० वर्षांत आणलेला निधी आणि आता सत्तेत असलेल्या विकास आघाडीने आणलेला ११४ कोटींचा निधी पाहता, शहराची अवस्था ‘आई जेऊ घालीना, बाप भीक मागू देईना’ अशीच आहे.

सत्तेत असताना राष्ट्रवादीने जयंत पाटील यांच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास करण्याचे नियोजन केले होते. यातील बहुतांश विकासकामे मार्गी लागली आहेत. तीही निकृष्ट दर्जाची आहेत, असे आरोपही झाले आहेत. पालिकेच्या नियोजनाअभावी अंबाबाई उद्यानासाठी पूर्वी खर्च केलेले कोट्यवधी रुपये मातीत गेले. त्याठिकाणी नवीन उद्यान उभे केले आहे. त्याच परिसरात असलेल्या पोहण्याच्या तलावाचा बेरंग झाला आहे. शहरात मंत्री कॉलनी आणि विशालनगर येथे उभारलेल्या बागा गेल्या दोन वर्षांपासून नियोजनअभावी भकास होत चालल्या आहेत. विशालनगर येथील नागरिकांनी एकत्रित येऊन, ही बाग आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याची देखरेख करतो, अशी मागणी केली आहे. यावरून पालिकेची आर्थिक स्थिती काय आहे, हे दिसून येते.

या परिसरातील रस्त्यांची अवस्था खडतर आहे. भुयारी गटारीचे तीन-तेरा वाजले आहेत. ज्या ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहेत, यावर जुजबी डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे हे रस्ते खड्डेमय बनले आहेत. शहरातील काही मुख्य चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले. यावरही पालिकेने लाखो रुपये खर्ची टाकले आहेत. परंतु या चौकांची शोभाच नष्ट होत चालली आहे. तत्कालीन राष्ट्रवादीने केलेल्या विकासाच्या घोषणा पालिकेत सत्ता नसल्याने हवेतच विरल्या आहेत. त्यामुळे मंत्री जयंत पाटील यांनी ग्राऊंडलेवलला येऊन शहराची पाहणी केली आहे. ही स्थिती पाहूनच त्यांच्या बारामती पॅटर्नचा चुराडा झाल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्यामुळेच त्यांनी थेट सत्ताधारी विकास आघाडीवर टीका केली आहे. त्याला सडेतोड उत्तरही विकास आघाडीने दिले आहे.

चाैकट

श्रेयवादासाठी भांडण

मंत्री जयंत पाटील व नगराध्यक्ष निशिकांत पाटील या दोघांच्या कलगीतुऱ्यामुळे मात्र शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने गटारींचे नियोजन, रस्ते, स्वच्छता, मालमत्ता वाढीव कर, बांधकामासाठी लागणारे परवाने, काही प्रभागात पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, कोरोनाबरोबरच आता डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यापेक्षा, नेते मात्र श्रेयवादासाठी भांडत आहेत.

फोटो - जयंत पाटील व निशिकांतदादा पाटील यांचे फोटो व पालिका लोगो