शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

एकाच गाडीतून आलो, तर बिघडले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:26 IST

इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदार एका गाडीतून आले, तर बिघडले कुठे? आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले आहेत का?’ ...

इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदार एका गाडीतून आले, तर बिघडले कुठे? आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले आहेत का?’ असा टोला मारला.खासदार राजू शेट्टी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमची संघटना लढा देत आहे. आघाडी सरकारच्या विरोधातही आम्ही आवाज उठवला आहे. शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रसंगी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, लालूप्रसाद यादव यांनाही आम्ही विरोध केला आहे. आमदार जयंत पाटील अर्थमंत्री असताना २००७ मध्ये कोल्हापूर-सांगली हा महामार्ग होणार होता. यामध्ये जयसिंगपूरमधील काही घरे पाडली जाणार होती. त्यावेळी मी स्वत: विरोध केला होता. या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी त्यावेळीही मी आणि जयंत पाटील एकाच गाडीत बसलो होतो.मिरज येथील कार्यक्रमावेळी एकाच गाडीतून प्रवास करण्याचा योगही असाच आला होता. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करू नये. लोकसभा निवडणुकीला अद्याप कालावधी आहे. जयंत पाटील ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्याच मतदारसंघाचा खासदार आहे. आता आमचे विचार शेतकºयांच्या हिताचेच आहेत. मात्र भाजप शेतकºयांच्या विरोधात आहे. निवडणुकीत भाजपकडून मिळालेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळेच मी त्यांच्यापासून फारकत घेत स्वतंत्रपणे शेतकºयांचा लढा सुरू केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप कोणत्याही पक्षाला साथ देण्याबाबत विचार केलेला नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.