शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

एकाच गाडीतून आलो, तर बिघडले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:26 IST

इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदार एका गाडीतून आले, तर बिघडले कुठे? आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले आहेत का?’ ...

इस्लामपूर : मिरज येथील कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी काही काळ एकाच वाहनातून प्रवास केला. याचे राजकीय मंडळींनी भांडवल केले. यावर खा. शेट्टी यांनी ‘खासदार-आमदार एका गाडीतून आले, तर बिघडले कुठे? आम्ही काय एकमेकांचे बांध रेटले आहेत का?’ असा टोला मारला.खासदार राजू शेट्टी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमची संघटना लढा देत आहे. आघाडी सरकारच्या विरोधातही आम्ही आवाज उठवला आहे. शेतकºयांना न्याय देण्यासाठी प्रसंगी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, लालूप्रसाद यादव यांनाही आम्ही विरोध केला आहे. आमदार जयंत पाटील अर्थमंत्री असताना २००७ मध्ये कोल्हापूर-सांगली हा महामार्ग होणार होता. यामध्ये जयसिंगपूरमधील काही घरे पाडली जाणार होती. त्यावेळी मी स्वत: विरोध केला होता. या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी त्यावेळीही मी आणि जयंत पाटील एकाच गाडीत बसलो होतो.मिरज येथील कार्यक्रमावेळी एकाच गाडीतून प्रवास करण्याचा योगही असाच आला होता. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करू नये. लोकसभा निवडणुकीला अद्याप कालावधी आहे. जयंत पाटील ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, त्याच मतदारसंघाचा खासदार आहे. आता आमचे विचार शेतकºयांच्या हिताचेच आहेत. मात्र भाजप शेतकºयांच्या विरोधात आहे. निवडणुकीत भाजपकडून मिळालेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळेच मी त्यांच्यापासून फारकत घेत स्वतंत्रपणे शेतकºयांचा लढा सुरू केला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अद्याप कोणत्याही पक्षाला साथ देण्याबाबत विचार केलेला नाही, असेही खा. शेट्टी यांनी स्पष्ट केले.