शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पतंगरावांमुळेच मी ‘अनाथांची माय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:13 IST

कडेगाव : आमदार डॉ. पतंगराव कदम गरीब घरात जन्माला आले नसते, तर ते गोरगरिबांचे कैवारी झाले नसते. त्यांनी माझी ...

कडेगाव : आमदार डॉ. पतंगराव कदम गरीब घरात जन्माला आले नसते, तर ते गोरगरिबांचे कैवारी झाले नसते. त्यांनी माझी मुलगी तसेच माझी अनाथ मुले भारती विद्यापीठात सांभाळली व शिकवली. त्यामुळे सिंधुताई ‘अनाथांची माय’ झाली आणि जगाला कळली. मी अनाथांसाठी जे कार्य उभे केले आहे, त्यास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. भारती विद्यापीठ व जनता हेच माझे सरकार आहे. त्यामुळे मला अनुदानाची गरजही भासली नाही, असे प्रतिपादन सिंधुताई सपकाळ यांनी केले.चिंचणी (ता. कडेगाव) येथे बाळकृष्ण पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील फौंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यानात सिंधुताई सपकाळ बोलत होत्या. यावेळी आ. मोहनराव कदम उपस्थित होते.सिंधुताई म्हणाल्या, संकटात खरी ऊर्जा सामावलेली असते. त्यामुळे संकटांना वेलकम म्हणा. संकटांना बळी न पडता आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करा. आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिम्मत होता कामा नये, इतके महिलांनी व मुलींनी सक्षम व्हायला हवे. विज्ञान युगात वावरत असलो तरी, संस्कृती जपली पाहिजे.वसंतराव माने यांनी प्रास्ताविक केले. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जि. प. सदस्या वैशाली कदम, सरपंच मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, प्रल्हाद पाटील, डॉ. गौरी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत बुरंग यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल पाटील यांनी आभार मानले....आणि सिंधुताई गहिवरल्यामाझा जीवनातील पहिला सत्कार आ. मोहनराव कदम यांनी सांगलीत केला. ज्या गावातून पतीने व नातेवाईकांनी मला दगड मारून हाकलून दिले, त्या माझ्या सासरच्या गावात पतंगरावांनी सत्कार केल्याची आठवण सिंधुतार्इंनी सांगितली. पतंगरावांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे सांगताना सिंधुताई यांना अश्रू अनावर झाले.