शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पतंगरावांमुळेच मी ‘अनाथांची माय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:13 IST

कडेगाव : आमदार डॉ. पतंगराव कदम गरीब घरात जन्माला आले नसते, तर ते गोरगरिबांचे कैवारी झाले नसते. त्यांनी माझी ...

कडेगाव : आमदार डॉ. पतंगराव कदम गरीब घरात जन्माला आले नसते, तर ते गोरगरिबांचे कैवारी झाले नसते. त्यांनी माझी मुलगी तसेच माझी अनाथ मुले भारती विद्यापीठात सांभाळली व शिकवली. त्यामुळे सिंधुताई ‘अनाथांची माय’ झाली आणि जगाला कळली. मी अनाथांसाठी जे कार्य उभे केले आहे, त्यास शासनाचे कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही. भारती विद्यापीठ व जनता हेच माझे सरकार आहे. त्यामुळे मला अनुदानाची गरजही भासली नाही, असे प्रतिपादन सिंधुताई सपकाळ यांनी केले.चिंचणी (ता. कडेगाव) येथे बाळकृष्ण पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त लक्ष्मीबाई बाळकृष्ण पाटील फौंडेशनच्यावतीने आयोजित व्याख्यानात सिंधुताई सपकाळ बोलत होत्या. यावेळी आ. मोहनराव कदम उपस्थित होते.सिंधुताई म्हणाल्या, संकटात खरी ऊर्जा सामावलेली असते. त्यामुळे संकटांना वेलकम म्हणा. संकटांना बळी न पडता आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करा. आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायची कोणाची हिम्मत होता कामा नये, इतके महिलांनी व मुलींनी सक्षम व्हायला हवे. विज्ञान युगात वावरत असलो तरी, संस्कृती जपली पाहिजे.वसंतराव माने यांनी प्रास्ताविक केले. कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, प्रा. मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जि. प. सदस्या वैशाली कदम, सरपंच मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, प्रल्हाद पाटील, डॉ. गौरी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत बुरंग यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल पाटील यांनी आभार मानले....आणि सिंधुताई गहिवरल्यामाझा जीवनातील पहिला सत्कार आ. मोहनराव कदम यांनी सांगलीत केला. ज्या गावातून पतीने व नातेवाईकांनी मला दगड मारून हाकलून दिले, त्या माझ्या सासरच्या गावात पतंगरावांनी सत्कार केल्याची आठवण सिंधुतार्इंनी सांगितली. पतंगरावांच्या जाण्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे सांगताना सिंधुताई यांना अश्रू अनावर झाले.