शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पतीची आत्महत्या; पत्नीचा गुदमरून मृत्यू

By admin | Updated: June 16, 2017 23:19 IST

पतीची आत्महत्या; पत्नीचा गुदमरून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कपुसेगाव : येथील शिक्षक कॉलनीत लिपिक पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर पत्नीचा अंथरूणातच गुदमरून मृत्यू झाला. पतीच्या आत्महत्येचे, तर पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचे कारण पोलिसांना समजले नसून, पत्नीचा व्हिसेरा पोलिसांनी राखून ठेवला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.याबाबत अधिक माहिती अशी की, निढळ (ता. खटाव) येथील हनुमान विद्यालयात सुनील कृष्णराव मखरे (वय ४९) हे लिपिक पदावर कार्यरत होते. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे पती-पत्नी घरातील माडीवर झोपले होते, तर त्यांची मुलगी अक्षदा ही खालच्या खोलीमध्ये झोपली होती. सकाळी बराचवेळ झाला तरी आई-बाबा का उठले नाहीत, हे पाहण्यासाठी अक्षदा माडीवर गेली असता तिला वडिलांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. तर आई अंथरुणावर निपचीत पडली होती. हा प्रकार पाहून अक्षदाने हंबरडा फोडला.तिने फौजदार असलेल्या भाऊ अतुल यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेही तत्काळ घरी आले. त्यांनी वहिनींना उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याही मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत काहीनी पुसेगाव पोलिसांनाही या प्रकाराची कल्पना दिली. त्यामुळे पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. डॉ. मेघना कुलकर्णी तसेच डॉ. प्रल्हाद इंजे यांनी शवविच्छेदन केले. सुनील यांचा मृत्यू गळफासाने झाला असल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाले. तर अनुराधा यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. मात्र कशामुळे गुदमरला हे अद्याप स्पष्ट झाले नसून तपासानंतर खरी वस्तुस्थिती समोर येणार आहे.सुनील मखरे हे गेल्या २२ वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी अनुराधा (वय ३९) या घरकाम करत होत्या. त्यांना अक्षदा नावाची एकुलती एक मुलगी आहे. सध्या तिने १२ वी शास्त्र शाखेत ५७ टक्के गुण मिळविले आहेत. तिला सातारा येथील कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याबाबत घरात चर्चाही झाली होती. तसेच सुनील मखरे यांनी आपल्याला शाळेतील कामाचा भयंकर त्रास होत असल्याबाबत पत्नीला वारंवार सांगितल्याचेही बोलले जात आहे. अत्यंत सुखी व आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंब म्हणून मखरे यांच्या घराकडे पाहिले जात होते. मात्र असे काय घडले की आपल्या एकुलत्या एक मुलीची काहीही काळजी न करता दोघांनीही आपली जीवनयात्रा संपवली, याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.आठ-दहा दिवसांपासून अनुराधा यांचे मौन !गेल्या आठ-दहा दिवसांपासून अनुराधा या काहीशा नाराज असल्याचे कॉलनीतील लोकांना जाणवत होते. शेजारील महिलांशी त्यांचे बोलणे खूपच कमी झाल्याची चर्चा आसपासच्या महिलांमध्ये होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी पती-पत्नीने घराभोवतीचा परिसर, फळ व फूल झाडांची बाग स्वच्छ केली होती. कधी-कधी पत्नी-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत होते; परंतु घराबाहेर याची वाच्यता कधीही झाली नसल्याची चर्चाही आहे.