शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वेळेत उपचार न मिळाल्याने पत्नीसमोरच पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:26 IST

दगडू आठवले गुरुवारी रात्री आठ वाजता मुंबईला जाण्यासाठी पत्नीसह मिरज रेल्वेस्थानकात आले. रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबले असताना रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराजवळ त्यांना ...

दगडू आठवले गुरुवारी रात्री आठ वाजता मुंबईला जाण्यासाठी पत्नीसह मिरज रेल्वेस्थानकात आले. रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबले असताना रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराजवळ त्यांना त्रास जाणवू लागला. यावेळी फोन केल्यानंतर रुग्णवाहिका वेळेत आली नाही. रेल्वेस्थानकात डॉक्टर किंवा उपचार करणारी यंत्रणा नव्हती. प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासणीसाठी महापालिकेच्या दोन आरोग्यसेविका उपस्थित होत्या.

दगडू आठवले यांची ऑक्सिजन पातळी कमी होऊन त्यांना श्वास घेणे कठीण झाले. काही वेळांत त्यांचा पत्नीसमोरच मृत्यू झाला. रेल्वेची कोणतेही रुग्णवाहिका अगर डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना वेळेत उपचार मिळाले नाहीत. तातडीने उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. रेल्वेस्थानकात उपचारासाठी रुग्णवाहिका किंवा डॉक्टर नसल्याने यापूर्वीही अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिरज रेल्वे स्थानक जंक्शन असूनही रेल्वेचे डाॅक्टर प्रवाशांच्या उपचारासाठी उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.