शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील शेकडो वर्षांचा साक्षीदार होणार जमीनदोस्त

By admin | Updated: October 15, 2016 20:16 IST

जुन्या सातारा प्रांतातील राजधानी असलेल्या विटा शहरातील शेकडो वर्षाचा साक्षीदार असलेला बुरूज येत्या चार दिवसांत जमीनदोस्त होणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
 
विटा, दि. १५ - जुन्या सातारा प्रांतातील राजधानी असलेल्या विटा शहरातील शेकडो वर्षाचा साक्षीदार असलेला बुरूज येत्या चार दिवसांत जमीनदोस्त होणार आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या टोलेजंग स्मारकासाठी या बुरूजाची जागा मोकळी करण्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. त्यामुळे इसवी सन १८०० पूर्वीच्या या ऐतिहासिक बुरूजाच्या पाऊलखुणा नष्ट होणार आहेत.
 
विटा शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात मराठी राज्यावर अनेक राजे झाले. या काळात त्र्यंबक कृष्ण देशपांडे यांच्याकडे विटा भाळवणीचे ‘देशपांडेपण’ होते. त्याच काळात विटा येथे त्र्यंबकरावांनी ऐतिहासिक काळाची साक्ष देणारा वाडा, तट व बुरूज बांधल्याचे सांगितले जाते. सध्या वाडा, तट नाहीसा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असलेल्या चौकातून दक्षिणेकडे अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या बुरूजाचा ताबा ब्रिटिशांकडेही होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या ऐतिहासिक बुरूजाची मालकी सरकारकडे गेली. त्यामुळे हा बुरूज सरकारकडेच होता.
 
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक याच बुरूजाच्या जागेवर व्हावे, अशी मागणी आण्णा भाऊ साठे स्मारक समितीने तत्कालीन आ. सदाशिवराव पाटील व विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे केली होती. त्यावेळी अण्णा भाऊप्रेमींनीही या जागेवरच स्मारक करावे, अशी मागणी लावून धरली. मात्र, ही जागा सरकारच्या ताब्यात असल्याने रितसर प्रस्ताव सादर करून बुरूजाची जागा विटा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 
गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी राज्य शासनाला या जागेची रितसर किंमत भरून ऐतिहासिक बुरूज असलेली सर्व म्हणजेच ३०० चौ. मी. (तीन गुंठे) जागा नगरपरिषदेच्या मालकी हक्काची करण्यात आली. त्यामुळे या जागेवर आता साहित्यरत्न अण्णा भाऊंचे टोलेजंग स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, विटा शहराची शेकडो वर्षांपासून साक्ष देणारा हा ऐतिहासिक बुरूज पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दगडी बांधकाम व त्यावर पांढºया मातीचा साठा असलेला हा भलामोठा बुरूज पाडण्यासाठी तीन ते चार दिवसांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक काळाचा साक्षीदार असलेला हा बुरूज जमीनदोस्त होत असताना पाहण्यासाठी विटेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
 
अण्णा भाऊंचे टोलेजंग स्मारक होणार...
ऐतिहासिक बुरूजाच्या जागेवर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. परंतु, या बुरूजाची जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यामुळे राज्य शासनाला या जागेसाठी रितसर रक्कम भरून ही जागा नगरपरिषदेच्या मालकीची करण्यात आली आहे. हा बुरूज काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच या जागेवर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचे टोलेजंग स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.
चौकट :
 
स्मारकाचे पावित्र्य राखणे गरजेचे...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे थोर साहित्यिक होते. त्यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे स्मारक ऐतिहासिक बुरूजाच्या जागी होत आहे, ही चांगली बाब आहे. आमचा त्यांच्या स्मारकाला विरोध नाही. परंतु, स्मारकाच्या बाजूलाच मटण मार्केट, दारू विक्री, ताडी-माडी विक्री अशी दुकाने असल्याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे पावित्र्य सुस्थितीत राहिले पाहिजे. ती सर्वांनीच जबाबदारी आहे. त्यासाठी नगरपरिषदेनेही अशी दुकाने अन्यत्र हलविणे गरजेचे असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी व्यक्त केले.