शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील शेकडो वर्षांचा साक्षीदार होणार जमीनदोस्त

By admin | Updated: October 15, 2016 20:16 IST

जुन्या सातारा प्रांतातील राजधानी असलेल्या विटा शहरातील शेकडो वर्षाचा साक्षीदार असलेला बुरूज येत्या चार दिवसांत जमीनदोस्त होणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
 
विटा, दि. १५ - जुन्या सातारा प्रांतातील राजधानी असलेल्या विटा शहरातील शेकडो वर्षाचा साक्षीदार असलेला बुरूज येत्या चार दिवसांत जमीनदोस्त होणार आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या टोलेजंग स्मारकासाठी या बुरूजाची जागा मोकळी करण्याचे काम नगरपरिषदेने हाती घेतले आहे. त्यामुळे इसवी सन १८०० पूर्वीच्या या ऐतिहासिक बुरूजाच्या पाऊलखुणा नष्ट होणार आहेत.
 
विटा शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळात मराठी राज्यावर अनेक राजे झाले. या काळात त्र्यंबक कृष्ण देशपांडे यांच्याकडे विटा भाळवणीचे ‘देशपांडेपण’ होते. त्याच काळात विटा येथे त्र्यंबकरावांनी ऐतिहासिक काळाची साक्ष देणारा वाडा, तट व बुरूज बांधल्याचे सांगितले जाते. सध्या वाडा, तट नाहीसा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असलेल्या चौकातून दक्षिणेकडे अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या बुरूजाचा ताबा ब्रिटिशांकडेही होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या ऐतिहासिक बुरूजाची मालकी सरकारकडे गेली. त्यामुळे हा बुरूज सरकारकडेच होता.
 
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक याच बुरूजाच्या जागेवर व्हावे, अशी मागणी आण्णा भाऊ साठे स्मारक समितीने तत्कालीन आ. सदाशिवराव पाटील व विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे केली होती. त्यावेळी अण्णा भाऊप्रेमींनीही या जागेवरच स्मारक करावे, अशी मागणी लावून धरली. मात्र, ही जागा सरकारच्या ताब्यात असल्याने रितसर प्रस्ताव सादर करून बुरूजाची जागा विटा नगरपरिषदेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 
गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी राज्य शासनाला या जागेची रितसर किंमत भरून ऐतिहासिक बुरूज असलेली सर्व म्हणजेच ३०० चौ. मी. (तीन गुंठे) जागा नगरपरिषदेच्या मालकी हक्काची करण्यात आली. त्यामुळे या जागेवर आता साहित्यरत्न अण्णा भाऊंचे टोलेजंग स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, विटा शहराची शेकडो वर्षांपासून साक्ष देणारा हा ऐतिहासिक बुरूज पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दगडी बांधकाम व त्यावर पांढºया मातीचा साठा असलेला हा भलामोठा बुरूज पाडण्यासाठी तीन ते चार दिवसांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक काळाचा साक्षीदार असलेला हा बुरूज जमीनदोस्त होत असताना पाहण्यासाठी विटेकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
 
अण्णा भाऊंचे टोलेजंग स्मारक होणार...
ऐतिहासिक बुरूजाच्या जागेवर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. परंतु, या बुरूजाची जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यामुळे राज्य शासनाला या जागेसाठी रितसर रक्कम भरून ही जागा नगरपरिषदेच्या मालकीची करण्यात आली आहे. हा बुरूज काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच या जागेवर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचे टोलेजंग स्मारक उभा करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.
चौकट :
 
स्मारकाचे पावित्र्य राखणे गरजेचे...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे थोर साहित्यिक होते. त्यांचे साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांचे स्मारक ऐतिहासिक बुरूजाच्या जागी होत आहे, ही चांगली बाब आहे. आमचा त्यांच्या स्मारकाला विरोध नाही. परंतु, स्मारकाच्या बाजूलाच मटण मार्केट, दारू विक्री, ताडी-माडी विक्री अशी दुकाने असल्याने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे पावित्र्य सुस्थितीत राहिले पाहिजे. ती सर्वांनीच जबाबदारी आहे. त्यासाठी नगरपरिषदेनेही अशी दुकाने अन्यत्र हलविणे गरजेचे असल्याचे मत माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे यांनी व्यक्त केले.