शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

विट्यात बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: May 27, 2015 01:00 IST

नापास होण्याच्या भीतीने कृत्य : आजच निकाल होणार जाहीर!

विटा : मार्चमध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या रचना सतीश दंडवते (वय १८, रा. यशवंतनगर, विटा, मूळ गाव हिंगणगाव खुर्द, ता. कडेगाव) या विद्यार्थिनीने घरी ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. बारावीचा एक पेपर अवघड गेल्याने नापास होण्याच्या भीतीने रचनाने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. विटा पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सतीश दंडवते यांची ती कन्या आहे. या घटनेने विटा शहरासह कडेगाव व खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.हिंगणगाव खुर्द येथील सतीश दंडवते कुटुंबियांसमवेत विटा येथे राहतात. त्यांची कन्या रचना मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. तिने मार्चमध्ये परीक्षा दिली होती. परीक्षेत तिला एका विषयाचा पेपर अवघड गेला होता. बुधवार, दि. २७ रोजी बारावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार आहे. मात्र अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीखाली ती कायम वावरत होती. मंगळवारी सकाळी आई, वडील, भाऊ व रचना कऱ्हाड येथे नातेवाईकांकडे जाणार होते. त्यांची तयारी सुरू होती. रचना बेडरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला होता. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला बाहेर बोलाविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिने ओढणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात नेले, परंतु तिथे दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी रचनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून या चिठ्ठीत ‘मला बारावीचा एका विषयाचा पेपर अवघड गेल्याने, मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असून याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूर आहे. या घटनेने विटा शहरात खळबळ उडाली होती. बारावीचा निकाल बुधवारी जाहीर होणार असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद विटा पोलिसांत झाली असून पोलीस उपनिरीक्षक आर. बी. वाघमोडे तपास करीत आहेत. (वार्ताहर)‘आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये’घटनास्थळी रचनाने लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून त्या चिठ्ठीत ‘मला बारावीचा एका विषयाचा पेपर अवघड गेल्याने, मी नापास होणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत असून याप्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये’, असा मजकूर लिहिला आहे.