शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार? दोन्ही डोस घेणारे केवळ सात टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

सांगली : जिल्ह्यात आजपर्यंत सहा लाख ६३ हजार ९१५ नागरिकांनी पहिला डोस, तर एक लाख ४३ हजार ७७५ जणांनी ...

सांगली : जिल्ह्यात आजपर्यंत सहा लाख ६३ हजार ९१५ नागरिकांनी पहिला डोस, तर एक लाख ४३ हजार ७७५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ‘डेल्टा प्लस’ची चिंता सतावत असताना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ सात टक्के आहे. ऑनलाईन नोंदणी होत नसल्यामुळे वयोवृध्दांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. देशभरातही १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात ४५ ते ६० वयोगट तर पाचव्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ या वयोगटातले लसीकरण सुरू करण्यात आले. केवळ एक-दोन दिवस विक्रमी लसीकरण होऊन चालणार नाही, तर त्यामध्ये सातत्य बाळगावे लागणार आहे. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक लसीकरण वाळवा तालुक्यात, तर सर्वात कमी लसीकरण जत तालुक्यात झाले आहे.

डेल्टा प्लस विषाणूविरोधात लढायचे असेल तर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी लसींचा पुरेसा पुरवठा, दररोजच्या लसीकरणाची संख्या वाढवणे यावर भर देणे गरजेचे आहे. आतापर्यंत दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये आरोग्य कर्मचारी ८२ टक्के, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ६५ टक्के, ६० वर्षांवरील नागरिक ३५ टक्के आहेत. ४५ ते ५९ या वयोगटातील १४ टक्के नागरिकांनी, तर १८ ते ४४ या वयोगटातील ०.४५ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेऊन तीन महिने झाले तरीही त्यांना दुसरा डोस मिळत नाही. ऑनलाईन नोंदणीच व्यवस्थित होत नसल्यामुळे वयोवृध्दांची गैरसोय होत आहे.

चौकट

जिल्ह्यातील लसीकरण : ८,०७,६९०

पहिला डोस : ६,६३,९१५

दुसरा डोस : १,४३,७७५

केंद्रे : २८८

चौकट

जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील लसीकरण ४.४५ टक्के

- जिल्ह्यात लसीकरण अत्यंत कमी गतीने होत आहे. अनेक ठिकाणी रांगामध्ये उभे राहूनही लस मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील ४.४५ टक्के नागरिकांना पहिला डोस दिला आहे. दुसरा डोस तर केवळ ०.४५ टक्केच नागरिकांना मिळाला आहे.

- जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने लसीकरणाची गती वाढवली नाही तर ‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार आहे, असा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.