शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

विस्कटली ‘गट्टी’ तर कशी वाजणार ‘शिट्टी’

By admin | Updated: May 23, 2017 23:28 IST

विस्कटली ‘गट्टी’ तर कशी वाजणार ‘शिट्टी’

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील शेट्टी अन् खोत यांची ‘गट्टी’ साऱ्यांनाच परिचित आहे. मात्र, सध्या या दोघांमध्ये दरी पडलेली दिसून येते. सदाभाऊंचा वाढलेला ‘भाव’ शेट्टींना अस्वस्थ करतोय. तर भाऊंना ‘कमळ’ खुणावतंय. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्तेही संभ्रमात पडलेत. एकाच संघटनेत असूनही ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी येथील कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. स्वाभिमानीत खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असणारा सुप्त संघर्ष आता बाहेर पडू लागलाय. दोघेही एकमेकांवर कुरघोडी अथवा टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. सोमवारी (दि. २२) पुणे येथून खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीची आत्मक्लेश पदयात्रा सुरू झालीय. पण त्याच्या पोस्टरवरून सदाभाऊंचा फोटो अगोदरच गायब झालाय. त्यामुळे शेट्टी अन् खोत यांची गट्टी आता फुटणार अशी चर्चा आहे. सदाभाऊ खोत यांना भाजपचं कमळ खुणावतंय, असे खात्रीशीर बोललं. जातंय. असं झालंच तर सातारा जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्ता शेट्टींनी हातात दिलेली स्वाभिमानीची शिट्टी टाकून देणार नाही, अशी आजची स्थिती आहे. मात्र, सदाभाऊंचा हातही रिकामाच राहील, असेही नाही.खरं तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत घोंगावणारे स्वाभिमानीचे वारे सातारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने घुसले ते सन २०१४ मध्ये. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून संघटनेने तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. पण पोलिसांनी परवानगी नाकारली आणि मोर्चेकरी बैलबाजारापर्यंत पोहोचले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. आणि पोलिसांनी आंदोलकांना महामार्गालगतच्या पाचवड फाटा येथे जागा उपलब्ध करून दिली. अनेक दिवस चाललेल्या या उपोषणाच्या यशस्वीतेसाठी कऱ्हाड तालुक्यातील गावागावांतून दररोज हजारो कार्यकर्त्यांसाठी पिठलं-भाकरीचं जेवण यायचं. त्यामुळे हे आंदोलन जणू कऱ्हाडकरांचं बनलं होतं. पाचवड फाट्यावरचे उपोषण संपले. पण संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी स्वत:च आंदोलन हातात घेतले. ‘खळखट्याकऽऽऽ’ सुरू झाले. अनेक वाहने पेटली. जनजीवन सुरळीत येण्यासाठी पुरा आठवडा सरला. त्यामुळे स्वाभिमानीची आक्रमकता कऱ्हाड तालुक्याला चांगलीच भावली. ..तर प्रत्येकाच्या वाटणीला एक जिल्हाध्यक्ष साताऱ्यात स्वाभिमानीचे दोन जिल्हाध्यक्ष आहेत. जिल्हा मोठा असल्याने जबाबदारी विभागल्याचे सांगितले जाते. संजय भगत व अर्जुन साळुंखे ही जबाबदारी सध्या सांभाळत आहेत. पण यातील एक जिल्हाध्यक्ष सदाभाऊंचा पाहुणा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे संघटनेत दरी पडली तरी प्रत्येकाच्या वाटणीला एक जिल्हाध्यक्ष येईल, हे नक्की !कऱ्हाडात शेट्टीच भक्कम... कऱ्हाड तालुक्यात स्वाभिमानीचे जाळे तसे तुलनेने मजबूत आहे. दक्षिणचे अध्यक्षपद देवानंद पाटील तर उत्तरचे अध्यक्षपद सचिन नलवडे सांभाळत आहेत. शहराध्यक्षपदाची जबाबदारी धनाजी शिंदे पार पाडत आहेत. हे तिघेही खासदार शेट्टी समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यात खोतांच्या हाताला फारशे काही लागेल, असे वाटत नाही.जिल्हाध्यक्षांची होतेय कसरतशेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी बढती देऊन त्यांना स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले गेले आहे. दोघांच्या वादात ही जबाबदारी सांभाळताना त्यांना कसरत करावी लागत आहे. पण निर्णय घ्यायचीच वेळ आली. तर ते काय करतील, हे आज सांगणे कठीण.आधी पंजाबराव नंतर घोरपडेही गेले...गत विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी आलेल्या मनोज घोरपडेंच्या हातात स्वाभिमानीने शिट्टी दिली. मात्र, दक्षिणेतून आपण प्रबळ दावेदार असतानाही संघटनेतील नेत्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न न केल्याचा आरोप करीत दुखावलेल्या पंजाबराव पाटलांनी संघटनेपासून फारकत घेतली. तर दुसरीकडे स्वाभिमानीची शिट्टी हातात घेतलेल्या घोरपडेंमुळे उत्तरेत संघटनेची ताकद वाढेल, ही आशा काही महिन्यांतच फोल ठरली. कारण मनोजदादांनी निवडणुकीनंतर काही महिन्यांतच भाजपच कमळ हातात घेणं पसंद केलं.