शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

महापालिका कर्ज फेडणार कसे?

By admin | Updated: November 27, 2015 00:05 IST

विरोधकांचा सवाल : सत्ताधारी कर्जावर ठाम, संघर्ष पेटणार

सांगली : महापालिकेकडील पाणी, ड्रेनेजसह विविध योजनांसाठी शंभर कोटी रुपयांचे कर्ज उभारणीला विरोधी नगरसेवकांनी विरोध केला. कर्ज घेतले तरी ते महापालिका कसे फेडणार, याची माहिती द्या, मगच कर्ज काढा, अशी सूचनाही सदस्यांनी केली. सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र कर्ज काढण्यावर ठाम होते. शासकीय योजना अर्धवट अवस्थेत आहेत. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. योजनांच्या पूर्ततेसाठी कर्ज आवश्यकच असल्याचे मतही सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केले. महापालिकेकडून शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी कर्ज उभारले जाणार आहे. त्यासंदर्भात गुरुवारी सत्ताधारी काँग्रेसने पुढाकार घेत सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक व प्रशासनाची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला महापौर विवेक कांबळे, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती किशोर जामदार, स्वाभिमानी आघाडीचे गटनेते शिवराज बोळाज, आयुक्त अजिज कारचे उपस्थित होते.बैठकीत सत्ताधारी व प्रशासनाने कर्जाचा आढावा घेतला. पाणी व ड्रेनेज या दोन योजनांसाठी शंभर कोटी रुपये लागणार असल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी व बोळाज यांनी आक्षेप घेतला. कर्जापेक्षा उत्पन्नाचे स्रोत वाढविले पाहिजेत. प्रशासनाने एलबीटी वसूल केलेला नाही. तेथून कोट्यवधी रुपये वसुली होऊ शकते. ड्रेनेज योजनेवर ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यातील एकही लाईन सुरू नाही. त्यामुळे पाच ते सात कोटीचा ड्रेनेज कर वसूल होऊ शकत नाही. या मुद्द्यांचा प्रशासनाने काय विचार केला आहे? कर्ज घेतले तरी ते कसे फेडणार आहात?, अशा प्रश्नांचा भडीमार केला. सत्ताधाऱ्यांनी मात्र, कर्जाशिवाय योजना पूर्ण होऊ शकत नाही, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी भूमिका घेतली. (प्रतिनिधी)पाणी, ड्रेनेज योजना सुरू करताना महाआघाडीने त्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना आखल्या नाहीत. आता या योजना अर्धवट स्थितीत आहेत. निधीअभावी त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यासाठी कर्ज हाच पर्याय आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी पालिकेकडे पुरेशी तरतूद आहे. पाणीपट्टी, घरपट्टीचे उत्पन्न वाढत आहे. त्यातून वर्षाकाठी दहा कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळले. त्याचा अहवाल प्रशासनाला देण्याची सूचना केली आहे. सर्वच पक्षांना विश्वासात घेऊन कर्जाचा निर्णय होईल. त्यासाठी प्रसंगी आणखी एक व्यापक बैठक घेण्याची तयारी आहे. - संतोष पाटील, स्थायी समिती सभापतीकांबळे-सूर्यवंशी वादबैठकीत महापौर विवेक कांबळे व विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांच्यात वाद झाला. सूर्यवंशी यांनी घेतलेल्या आक्षेपाला महापौरांनी हरकत घेतली. आपण सत्ताधारी आहोत, विरोधकांना काय विचारचे? आपण कर्जाचा निर्णय घेऊया, असे महापौर कांबळे म्हणताच, सूर्यवंशी यांनी बैठक अर्धवट सोडून तेथून निघून जाणेच पसंत केले.