शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसणार कसा?

By admin | Updated: February 28, 2017 23:49 IST

विटा नगरपालिकेसमोर आव्हान : उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट : पाणीपट्टीत वाढ आवश्यक

दिलीप मोहिते ल्ल विटासांगली जिल्ह्यातील सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या विटा शहरात काही वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये पदार्थ घेतल्याशिवाय ग्लासभरही पाणी मिळत नव्हते. अशी परिस्थिती असलेल्या या शहरात १९९८ पासून कृष्णा घोगाव नळपाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले असले तरी, सध्या या योजनेचा खर्च उत्पन्नापेक्षा दुप्पट होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला वार्षिक सुमारे २ कोटी १० लाख रूपये नुकसान सहन करून ही योजना सुरू ठेवावी लागत असल्याने, आगामी काळात या कृष्णा घोगाव नळपाणी पुरवठा योजनेचा पांढरा हत्ती पोसायचा कसा? असा प्रश्न पालिका कारभाऱ्यांसह प्रशासनाला पडला आहे. विटा शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी १९९८ ला शहरापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या घोगाव येथील कृष्णा नदीतून पाणी योजना सुरू करण्यात आली. आळसंद तलावाजवळ पाणी फिल्टर यंत्रणा उभारून तेथून स्वच्छ व निर्जंतुक पाणी विटेकरांना देण्यात येऊ लागले आहे. शहरात सध्या अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनची संख्या ८ हजार ८९७ असून, त्यांना वार्षिक प्रत्येकी दोन हजार रुपये पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. तसेच वाणिज्य, विशेष प्रवर्ग, पाऊण इंची घरगुती, वाणिज्य व विशेष प्रवर्ग नळ कनेक्शन्सची संख्या अवघी २१३ इतकी आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाकडे पाणीपट्टीच्या रूपाने वार्षिक १ कोटी ८८ लाख ५७ हजार १०० रूपये रक्कम जमा होत आहे. परंतु, या योजनेचा वार्षिक खर्च पाहता, तो उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. नदीतून पाणी उचलण्यासाठी २२ लाख २९ हजार ८२१, घोगाव व आळसंद येथील पंपगृहाचे वीज बिल २ कोटी ६१ लाख ४ हजार ३९० रूपये, देखभाल, दुरूस्तीसाठी २५ लाख ९६ हजार ९७६ रूपये, पाणी शुध्दीकरणासाठी १० लाख ८८ हजार ९४५ रूपये, कर्मचारी पगारावर ५० लाख ७४ हजार २३ रूपये, ट्रान्स्फॉर्मर दुरूस्ती व यंत्रसामग्री खरेदीसाठी ५ लाख ५७ हजार ५६३, किरकोळ खर्च ८ लाख ७० हजार ५६ व पाईप खरेदीसाठी १ कोटी २८ लाख ३ हजार ७५६ रूपये, असा सुमारे ३ कोटी ९८ लाख २५ हजार ५३० रूपये वार्षिक खर्च या योजनेवर होत आहे.त्यामुळे पाणीपट्टीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम पाणी योजनेवर खर्च होत आहे. परिणामी, विट्याची घोगाव पाणी योजना स्वावलंबी नसल्याने, शासनाने ही योजना स्वयंपूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून रखडलेली पाणीपट्टी दरातील वाढ करण्याशिवाय पालिका प्रशासनाला गत्यंतरच राहिले नाही. दरम्यान, पाणीपट्टी दरात पाचशे ते हजाराची वाढ केली तरी उत्पन्न काहीअंशी वाढेल. पण ही योजना स्वावलंबी होण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आगामी काळात विटा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसण्याचे आव्हानच विटा नगरपालिकेसमोर आता उभे राहिले आहे.