शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसणार कसा?

By admin | Updated: February 28, 2017 23:49 IST

विटा नगरपालिकेसमोर आव्हान : उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट : पाणीपट्टीत वाढ आवश्यक

दिलीप मोहिते ल्ल विटासांगली जिल्ह्यातील सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या विटा शहरात काही वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये पदार्थ घेतल्याशिवाय ग्लासभरही पाणी मिळत नव्हते. अशी परिस्थिती असलेल्या या शहरात १९९८ पासून कृष्णा घोगाव नळपाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले असले तरी, सध्या या योजनेचा खर्च उत्पन्नापेक्षा दुप्पट होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला वार्षिक सुमारे २ कोटी १० लाख रूपये नुकसान सहन करून ही योजना सुरू ठेवावी लागत असल्याने, आगामी काळात या कृष्णा घोगाव नळपाणी पुरवठा योजनेचा पांढरा हत्ती पोसायचा कसा? असा प्रश्न पालिका कारभाऱ्यांसह प्रशासनाला पडला आहे. विटा शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी १९९८ ला शहरापासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या घोगाव येथील कृष्णा नदीतून पाणी योजना सुरू करण्यात आली. आळसंद तलावाजवळ पाणी फिल्टर यंत्रणा उभारून तेथून स्वच्छ व निर्जंतुक पाणी विटेकरांना देण्यात येऊ लागले आहे. शहरात सध्या अर्धा इंची घरगुती नळ कनेक्शनची संख्या ८ हजार ८९७ असून, त्यांना वार्षिक प्रत्येकी दोन हजार रुपये पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. तसेच वाणिज्य, विशेष प्रवर्ग, पाऊण इंची घरगुती, वाणिज्य व विशेष प्रवर्ग नळ कनेक्शन्सची संख्या अवघी २१३ इतकी आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाकडे पाणीपट्टीच्या रूपाने वार्षिक १ कोटी ८८ लाख ५७ हजार १०० रूपये रक्कम जमा होत आहे. परंतु, या योजनेचा वार्षिक खर्च पाहता, तो उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. नदीतून पाणी उचलण्यासाठी २२ लाख २९ हजार ८२१, घोगाव व आळसंद येथील पंपगृहाचे वीज बिल २ कोटी ६१ लाख ४ हजार ३९० रूपये, देखभाल, दुरूस्तीसाठी २५ लाख ९६ हजार ९७६ रूपये, पाणी शुध्दीकरणासाठी १० लाख ८८ हजार ९४५ रूपये, कर्मचारी पगारावर ५० लाख ७४ हजार २३ रूपये, ट्रान्स्फॉर्मर दुरूस्ती व यंत्रसामग्री खरेदीसाठी ५ लाख ५७ हजार ५६३, किरकोळ खर्च ८ लाख ७० हजार ५६ व पाईप खरेदीसाठी १ कोटी २८ लाख ३ हजार ७५६ रूपये, असा सुमारे ३ कोटी ९८ लाख २५ हजार ५३० रूपये वार्षिक खर्च या योजनेवर होत आहे.त्यामुळे पाणीपट्टीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम पाणी योजनेवर खर्च होत आहे. परिणामी, विट्याची घोगाव पाणी योजना स्वावलंबी नसल्याने, शासनाने ही योजना स्वयंपूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून रखडलेली पाणीपट्टी दरातील वाढ करण्याशिवाय पालिका प्रशासनाला गत्यंतरच राहिले नाही. दरम्यान, पाणीपट्टी दरात पाचशे ते हजाराची वाढ केली तरी उत्पन्न काहीअंशी वाढेल. पण ही योजना स्वावलंबी होण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे आगामी काळात विटा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या घोगाव पाणी योजनेचा पांढरा हत्ती पोसण्याचे आव्हानच विटा नगरपालिकेसमोर आता उभे राहिले आहे.