शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

तासगावातील २१ गावांची मते कशी चालतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

तासगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव तालुक्यात तत्त्वतः मंजूर झाले, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. शिवाय परिसराचा विकास ...

तासगाव : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र तासगाव तालुक्यात तत्त्वतः मंजूर झाले, त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. शिवाय परिसराचा विकास होणार आहे; मात्र आमदार अनिल बाबर आणि वैभव पाटील यांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यांना तासगाव तालुक्यातील मते चालतात, पण विकास नाही, असा आरोप महाराष्ट्र विद्‌यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस राजीव मोरे यांनी केला आहे.

ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र सांगली जिल्ह्यात मंजूर करण्यासाठी २०१३ मध्ये आम्ही आंदोलन केले होते, जिल्हाधिकारी कार्यालयावर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला होता. आता मंजूर उपकेंद्र पळविण्याचा प्रयत्न करणारे त्यावेळी कुठेही नव्हते किंवा त्यांना विद्यार्थ्यांच्या अडचणींशी काहीही देणे-घेणे नाही. यांना केवळ राजकारण करायचे आहे.

विद्यापीठ उपकेंद्र स्वतःच्याच मतदार संघात नेण्यासाठी ते काय महाविद्यालय आहे का?, शिराळा ते जतपासून माणपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यवर्ती ठरेल अशा ठिकाणची जागा यापूर्वी कुलगुरू समितीने तासगाव तालुक्यात निश्चित केली आहे, मात्र आता अचानक जागे होऊन खानापूर तालुक्यातील नेते उपकेंद्र पळविण्यासाठी धडपडत आहेत.

तासगाव तालुक्यात उपकेंद्रासाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध आहेत. शासनाने एकदा मंजूर केल्यानंतर खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील नेते आता उपकेंद्र मागणीसाठी धडपडत आहेत. खानापूर तालुक्यातील नेत्यांना तासगाव तालुक्यातील २१ गावांतील मतदान चालते, मग या भागात विद्यापीठ उपकेंद्र येत असेल, तर त्यांना त्याची अडचण का वाटत आहे? त्या नेत्यांनी आता आम्हाला या गावातील विद्यार्थी आणि नागरिकांची गरज नाही, असे तरी घोषित करावे.

तुम्हाला जे काही राजकारण करायचे ते इतर प्रश्नांवर करावे, विद्यार्थी समस्येवर नको. तासगाव तालुका मध्यवर्ती असल्यानेच समितीने ही जागा निश्चित केली आहे. जर यामध्ये राजकारण झाले, तर आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशाराही राजीव मोरे यांनी दिला.