शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

फळबाग आगीत खाक

By admin | Updated: December 29, 2016 23:11 IST

निगडी खुर्दमधील घटना : दहा लाखांचे नुकसान

जत : तालुक्यातील निगडी खुर्द येथील विजय लक्ष्मण जाधव व राजकुमार लक्ष्मण जाधव यांच्या शेतजमिनीतील फळबागेला विद्युतवाहिनीतून ठिणग्या पडून आग लागली. यामध्ये दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना २० डिसेंबररोजी दुपारी एकच्यादरम्यान घडली. याप्रकरणी जाधव बंधूूंनी गुरुवारी (दि. २९) जत पोलिसांत तक्रार दाखल केली.निगडी खुर्द गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतजमिनीत आंबा, चिकू व द्राक्षबाग असून, सभोवताली पेरू, अंजीर, नारळ आदी फळझाडे लावली आहेत. फळबाग आणि झाडांना ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या फळबागेवरून पवनऊर्जा कंपनीच्या उच्चदाब विद्युत वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. २० डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्यादरम्यान वीज वाहक तारांमधून ठिणग्या बागेत पडल्याने संपूर्ण आंब्याची, चिकूची बाग व सभोवताली असलेली पेरू, अंजीर, नारळाची झाडे आणि द्राक्षबागेतील दोनशे झाडे जळून भस्मसात झाली. आग लागल्यानंतर ठिबक सिंचनची पाईप वितळून गेली आहे. याप्रकरणी गावकामगार तलाठी निखिल पाटील, कोतवाल विनोद कोळी, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा प्रस्ताव त्यांनी शासनाला सादर केला आहे.शासनाने पंचनामा करून आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे दाखविले आहे. मागील आठ-दहा वर्षांपासून फळबागेची जोपासना केली आहे. ठिबक सिंचनची संपूर्ण यंत्रणा भस्मसात झाली आहे. आता नव्याने फळबागेची उभारणी करावी लागणार आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जाधव बंधूूंनी केली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनीही महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)