शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित

By admin | Updated: October 18, 2015 23:35 IST

जत तालुक्यात खरीप वाया : चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटणार; पेरणी अंतिम टप्प्यात

गजानन पाटील-- संख--गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यातील रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाअभावी सलग तिसऱ्या वर्षी खरीप हंगाम वाया गेला होता; परंतु परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये समाधानकारक हजेरी लावली आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागाचा अपवाद वगळता पाऊस झाल्याने हंगाम पार पडण्याची शक्यता आहे. रानात खुरटे गवत आल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. सर्वत्र पेरणी सुरू झाल्याने मजुरीच्या व बैलजोडीच्या दरात वाढ झाली आहे. यंदा मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली होती. आॅगस्ट महिन्यामध्ये ५४ गावांत ४७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. अशावेळी सर्व मदार परतीच्या पावसावर अवलंबून होती.परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये हजेरी लावली. गेल्या आठवड्यामध्ये पाऊस समाधानकारक पडल्याने पेरणीला सुरुवात होऊन ६७ टक्के पेरणी झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३ मिलिमीटर असून, आजअखेर २२६.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ४८ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पाऊस न झाल्याने एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही.पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते.त्याशिवाय करडई २ हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर, मका ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित इतर गळीत धान्ये घेतली जातात. बाजारात ज्वारीचे मालदांडी (३५-१), स्वाती (एस ९ आर) बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय संकरित ज्वारीचे, सी-सी एच ८ आर, ही घरगुती बियाणे पेरली जातात. मक्याचे पारस, विजय, महाबीज, गंगा, कावेरी, मायको तसेच सूर्यफुलाचे महिको, विजय, महाधन, गंगा, कावेरी वाणांची बियाणे उपलब्ध आहेत.पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने जत बाजारपेठेत, तहसील कार्यालय, गावात स्टॅन्डवर नेहमीसारखी गर्दी दिसून येत नाही. सर्वत्र कामाची धांदल सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे, खताचे दर गेल्यावर्षीपेक्षा १० टक्क्याने वाढले आहेत. आगाप पेरणी झालेल्या ठिकाणी अनुकूल हवामान, पाऊस यामुळे उगवण चांगली झाली आहे.पाऊस दमदार झाला नसल्याने जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. अजूनही उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंतराळ, बसरगी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी या २४ गावांत ३१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पावसाने दिलासा : बैलजोडीचा भाव वाढला दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने बैलजोड्यांना मागणी वाढली आहे. ट्रॅक्टरपेक्षा बैलजोड्यांद्वारे पेरणी केल्यास पिकांची उगवण चांगली होते, असे शेतकऱ्यांचे मत आहे. पेरणीसाठी बैलजोडीचा दर १७०० ते २ हजार रुपये इतका आहे. १ दिवसासाठी पुरुषास २०० रुपये, तर स्त्री मजुरासाठी १५० रुपये मजुरी आहे.