शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित

By admin | Updated: October 18, 2015 23:35 IST

जत तालुक्यात खरीप वाया : चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटणार; पेरणी अंतिम टप्प्यात

गजानन पाटील-- संख--गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यातील रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाअभावी सलग तिसऱ्या वर्षी खरीप हंगाम वाया गेला होता; परंतु परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये समाधानकारक हजेरी लावली आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागाचा अपवाद वगळता पाऊस झाल्याने हंगाम पार पडण्याची शक्यता आहे. रानात खुरटे गवत आल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. सर्वत्र पेरणी सुरू झाल्याने मजुरीच्या व बैलजोडीच्या दरात वाढ झाली आहे. यंदा मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली होती. आॅगस्ट महिन्यामध्ये ५४ गावांत ४७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. अशावेळी सर्व मदार परतीच्या पावसावर अवलंबून होती.परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये हजेरी लावली. गेल्या आठवड्यामध्ये पाऊस समाधानकारक पडल्याने पेरणीला सुरुवात होऊन ६७ टक्के पेरणी झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३ मिलिमीटर असून, आजअखेर २२६.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ४८ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पाऊस न झाल्याने एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही.पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते.त्याशिवाय करडई २ हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर, मका ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित इतर गळीत धान्ये घेतली जातात. बाजारात ज्वारीचे मालदांडी (३५-१), स्वाती (एस ९ आर) बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय संकरित ज्वारीचे, सी-सी एच ८ आर, ही घरगुती बियाणे पेरली जातात. मक्याचे पारस, विजय, महाबीज, गंगा, कावेरी, मायको तसेच सूर्यफुलाचे महिको, विजय, महाधन, गंगा, कावेरी वाणांची बियाणे उपलब्ध आहेत.पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने जत बाजारपेठेत, तहसील कार्यालय, गावात स्टॅन्डवर नेहमीसारखी गर्दी दिसून येत नाही. सर्वत्र कामाची धांदल सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे, खताचे दर गेल्यावर्षीपेक्षा १० टक्क्याने वाढले आहेत. आगाप पेरणी झालेल्या ठिकाणी अनुकूल हवामान, पाऊस यामुळे उगवण चांगली झाली आहे.पाऊस दमदार झाला नसल्याने जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. अजूनही उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंतराळ, बसरगी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी या २४ गावांत ३१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पावसाने दिलासा : बैलजोडीचा भाव वाढला दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने बैलजोड्यांना मागणी वाढली आहे. ट्रॅक्टरपेक्षा बैलजोड्यांद्वारे पेरणी केल्यास पिकांची उगवण चांगली होते, असे शेतकऱ्यांचे मत आहे. पेरणीसाठी बैलजोडीचा दर १७०० ते २ हजार रुपये इतका आहे. १ दिवसासाठी पुरुषास २०० रुपये, तर स्त्री मजुरासाठी १५० रुपये मजुरी आहे.