शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सर्वसामान्यांचे आशास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST

सुहासनाना शिंदे यांची राजकीय कारकीर्द सन २००७च्या पंचायत समिती निवडणुकीपासून सुरू झाली. २०१२ मध्ये काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. ...

सुहासनाना शिंदे यांची राजकीय कारकीर्द सन २००७च्या पंचायत समिती निवडणुकीपासून सुरू झाली. २०१२ मध्ये काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद निवडणूक जिंकली. यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीस दमदार सुरुवात झाली. यापुढील काळात त्यांनी विविध पदे यशस्वीपणे भुषवित मोठे यश संपादन केले.

सुहासनानांनी जिल्हा परिषद सदस्य असताना खानापूर गटात कोट्यवधी रुपयांची कामे केली. खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न केले. यामुळे त्यांची लोकसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. याशिवाय त्यांची जिल्हा समिती नियोजन समिती सदस्यपदी दोनवेळा निवड झाली.

सध्या लेंगरे जिल्हा परिषद गटात सुहासनाना शिंदे यांनी कायम कार्यरत राहणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. जिल्हा परिषद गटातील कोणाचेही आणि कोणतेही काम नाना तत्परतेने करतात, असा जनमानसात त्यांनी विश्वास निर्माण केला आहे.

खानापूर शहरात २०१६ मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली. त्याचवर्षी झालेल्या निवडणुकीत सुहासनानांनी सत्ता मिळवत नगरपंचायत ताब्यात घेतली. गेल्या पाच वर्षांत सर्व नगरसेवकांना विविध पदांवर काम करण्याची संधी देत नगरपंचायतीचा समतोल राखला. यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. नानांनी खानापूर शहरात विविध माध्यमांतून कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून सर्व प्रभागात पारदर्शकपणे कामे केली. सर्व शासकीय योजना नगरसेवक, मुख्याधिकारी व नागरिकांच्या सहकार्याने राबवत प्रत्येक स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन करीत कोट्यवधी रुपयांची बक्षिसे मिळविली. या कालावधीत त्यांनी माजी पालक मंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सहकार्याने विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.

याची पोहोच पावती म्हणून नानांच्या पाठीशी युवकांची मोठी फळी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलकाद्वारे खानापूर घाटमाथा पोस्टरमय केला आहे. लहानथोर मंडळींच्या मनात आदराचे स्थान निर्माण केलेल्या मा. सुहास (नाना) शिंदे यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.

चाैकट सन २००२ मध्ये अजिंक्य उद्योग समूह व दूध डेअरीची स्थापना, गावोगावी दूध संकलन केंद्रांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार निर्मिती.

सन २००३ ते २०१० पर्यंत युवकांचे संघटन, सामाजिक उपक्रम राबवून तरुणांना प्रोत्साहित करणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन.

सन २०११ मध्ये विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड.

सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत विजय, तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड,

सन २०१३ मध्ये कै. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती,

सन २०१४ मध्ये लोकसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड,

सन २०१६ च्या खानापूर नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापन,

सन २०१७ मध्ये खानापूर घाटमाथ्यावरील विविध ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन,

सन २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार अनिल (भाऊ) बाबर यांना पाठिंबा.

सन २०२१ मध्ये जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून दुसऱ्यांदा निवड,

कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊन काळात सुहासनानांनी खानापूर घाटमाथ्यावरील प्रत्येक गावात गरजूंना मदत करत उल्लेखनीय कार्य केले. गोरगरीब जनतेसाठी खानापूर येथे त्यांनी डॉ. उदयसिंह हजारे यांच्या सहकार्याने मातोश्री कोविड सेंटरची स्थापना केली होती. याचा लाभ अनेक रुग्णांना झाला. वाढदिवसानिमित्त रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय दोनशे महिलांना घरोघरी उपयोगात येणाऱ्या आटा चक्की सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे.