शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘आंतरजिल्हा बदली’ झालेले शिक्षक हवालदिल

By admin | Updated: July 7, 2017 01:10 IST

दिवसभर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या : निर्णय होऊनही अद्याप सुटका नाही; आज निर्णय शक्य

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘आंतरजिल्हा बदली’ला मान्यता मिळालेल्या २४९ शिक्षकांना अजूनही कोल्हापूर जिल्हा परिषदेने न सोडल्याने हवालदिल झालेल्या शिक्षकांनी गुरुवारी दिवसभर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारला. दिवसभर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी फेऱ्या मारणाऱ्या या शिक्षकांना अखेर दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने उद्या याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. गेली अनेक वर्षे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना यंदा बदलीची संधी मिळाली. रोस्टर, बाहेरून येणाऱ्या शिक्षकांची मागणी, अन्य निकष आणि नियमांमधून सुटका होत अखेर २४९ शिक्षकांच्या मागणीप्रमाणे बदल्या करण्याचा निर्णय झाला. संबंधित शिक्षकांना तातडीने सोडावे, असे आदेशही गेल्या चार दिवसांत देण्यात आले आहेत. मात्र, आपल्या जिल्ह्यात शिक्षक कमी पडतील या भीतीने कोणत्याही जिल्हा परिषदेने आहे त्या शिक्षकांना न सोडण्याची भूमिका घेतली होती. गेले दहा दिवस बदल्या झालेले शिक्षक जिल्हा परिषदेत येरझाऱ्या मारत आहेत. गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने हे शिक्षक जिल्हा परिषदेसमोर जमले. सांगली, सातारा, सोलापूरपासून अगदी नागपूर, औरंगाबादपर्यंतच्या जिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांचा आता संयम सुटायला लागला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास तीस, चाळीस शिक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना भेटण्यासाठी निघाले. मात्र, डॉ. खेमनार बैठकीला पुण्याला गेल्याचे समजल्यानंतर या सर्वांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांना भेटण्याचा निर्णय (पान ६ वर) त्याअंतर्गत विना अनुदानित शाळांतील शिक्षकांनी भजन आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या दरम्यान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या कृती समितीच्या शिष्टमंडळासमवेत मुंबई येथे चर्चा केली. त्यात त्यांनी कृती समितीच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन गांभीर्याने विचार करत आहे शिवाय येत्या अधिवेशनामध्ये या मागण्यांबाबत निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे हे आंदोलन कृती समितीने मागे घ्यावे, असे आवाहन केले. त्यावर समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मुलं गावाकडं :आता गावाकडच्या जिल्ह्यात बदली होणार म्हणून अनेक शिक्षिकांनी आपल्या लहान मुलांना तिकडेच आई-वडिलांकडे किंवा सासू-सासऱ्यांकडे ठेवले आहे. १५ जूनच्या आधीच या बदल्या होतील असे वाटत असताना १५ जुलै आला तरी बदल्या नसल्याने या शिक्षिका हवालदिल झाल्या आहेत. काही महिला तर लहान मुलांना मांडीवर घेऊन जिल्हा परिषदेच्या आवारात बसून होत्या.