शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गबाधित कृती समितीचा अंकली फाट्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी अंकली फाटा येथे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महामार्ग, महापूर बाधित कृती समितीने वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग इनामधामणी गावाला खेटून जात आहे. त्याच्या दुतर्फा भलीमोठी संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. पाटील यांनी सांगितले की, या भिंतीमुळे महापुराचे पाणी कृष्णेत परतण्यात अडथळे येणार आहेत. बॅकवॉटरमुळे संपूर्ण इनाम धामणी गाव पाण्याखाली जाणार आहे. शिवाय पुराचे पाणी सांगलीतही शिरण्याचा धोका आहे. सुमारे चार किलोमीटरपर्यंत रस्त्याची उंची सात फुटांपासून १३ फुटांपर्यंत वाढविण्यात येत असल्याने सांगलीकरांसमोर कृत्रिम महापुराचे संकट आहे. महामार्गासाठी एक प्रकारे बांध घालण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला पुढे पुन्हा कृष्णा नदीत जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. इनामधामणीसह सांगलीच्या विस्तारित भागालाही याचा धोका आहे.

याविरोधात इनाम धामणी, अंकली, निलजी बामणीसह आसपासच्या गावांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी अंकली फाटा चौकात ठिय्या आंदोलन करून समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याची उंची वाढवण्याऐवजी अंकली ते मिरज या चार किलोमीटर अंतरात फ्लायओव्हर निर्माण करावा, अशी मागणी केली. तसे निवेदन मंडलाधिकारी श्रीकांत घाळे यांना देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.

आंदोलनात विठ्ठल पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते, हरिपूरचे सरपंच विकास हणबर, आदिनाथ मगदूम, परशराम कोळी, महावीर पाटील, प्रदीप मगदूम आदी सहभागी झाले.

चौकट

पाइपचा पर्याय मलमपट्टी करणारा

पुराचे पाणी रस्त्याखालून पलीकडे जाण्यासाठी तीन ठिकाणी पाइप टाकणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; पण पुराचे प्रचंड पाणी वाहून नेण्यासाठी ही पाइपलाइन पुरेशी नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाइप टाकून तात्पुरता मलमपट्टी म्हणजे वेळ काढण्याचा प्रकार आहे. पाइप टाकण्याने पुराची तीव्रता कमी होणार नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती असल्याचे आंदोलकांनी सांगितले.