शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

महामार्गबाधित कृती समितीचा अंकली फाट्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी अंकली फाटा येथे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महामार्ग, महापूर बाधित कृती समितीने वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग इनामधामणी गावाला खेटून जात आहे. त्याच्या दुतर्फा भलीमोठी संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. पाटील यांनी सांगितले की, या भिंतीमुळे महापुराचे पाणी कृष्णेत परतण्यात अडथळे येणार आहेत. बॅकवॉटरमुळे संपूर्ण इनाम धामणी गाव पाण्याखाली जाणार आहे. शिवाय पुराचे पाणी सांगलीतही शिरण्याचा धोका आहे. सुमारे चार किलोमीटरपर्यंत रस्त्याची उंची सात फुटांपासून १३ फुटांपर्यंत वाढविण्यात येत असल्याने सांगलीकरांसमोर कृत्रिम महापुराचे संकट आहे. महामार्गासाठी एक प्रकारे बांध घालण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला पुढे पुन्हा कृष्णा नदीत जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. इनामधामणीसह सांगलीच्या विस्तारित भागालाही याचा धोका आहे.

याविरोधात इनाम धामणी, अंकली, निलजी बामणीसह आसपासच्या गावांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी अंकली फाटा चौकात ठिय्या आंदोलन करून समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याची उंची वाढवण्याऐवजी अंकली ते मिरज या चार किलोमीटर अंतरात फ्लायओव्हर निर्माण करावा, अशी मागणी केली. तसे निवेदन मंडलाधिकारी श्रीकांत घाळे यांना देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.

आंदोलनात विठ्ठल पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते, हरिपूरचे सरपंच विकास हणबर, आदिनाथ मगदूम, परशराम कोळी, महावीर पाटील, प्रदीप मगदूम आदी सहभागी झाले.

चौकट

पाइपचा पर्याय मलमपट्टी करणारा

पुराचे पाणी रस्त्याखालून पलीकडे जाण्यासाठी तीन ठिकाणी पाइप टाकणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; पण पुराचे प्रचंड पाणी वाहून नेण्यासाठी ही पाइपलाइन पुरेशी नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाइप टाकून तात्पुरता मलमपट्टी म्हणजे वेळ काढण्याचा प्रकार आहे. पाइप टाकण्याने पुराची तीव्रता कमी होणार नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती असल्याचे आंदोलकांनी सांगितले.