शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गबाधित कृती समितीचा अंकली फाट्यावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी अंकली फाटा येथे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महामार्ग, महापूर बाधित कृती समितीने वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.

रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग इनामधामणी गावाला खेटून जात आहे. त्याच्या दुतर्फा भलीमोठी संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. पाटील यांनी सांगितले की, या भिंतीमुळे महापुराचे पाणी कृष्णेत परतण्यात अडथळे येणार आहेत. बॅकवॉटरमुळे संपूर्ण इनाम धामणी गाव पाण्याखाली जाणार आहे. शिवाय पुराचे पाणी सांगलीतही शिरण्याचा धोका आहे. सुमारे चार किलोमीटरपर्यंत रस्त्याची उंची सात फुटांपासून १३ फुटांपर्यंत वाढविण्यात येत असल्याने सांगलीकरांसमोर कृत्रिम महापुराचे संकट आहे. महामार्गासाठी एक प्रकारे बांध घालण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला पुढे पुन्हा कृष्णा नदीत जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. इनामधामणीसह सांगलीच्या विस्तारित भागालाही याचा धोका आहे.

याविरोधात इनाम धामणी, अंकली, निलजी बामणीसह आसपासच्या गावांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी अंकली फाटा चौकात ठिय्या आंदोलन करून समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याची उंची वाढवण्याऐवजी अंकली ते मिरज या चार किलोमीटर अंतरात फ्लायओव्हर निर्माण करावा, अशी मागणी केली. तसे निवेदन मंडलाधिकारी श्रीकांत घाळे यांना देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.

आंदोलनात विठ्ठल पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते, हरिपूरचे सरपंच विकास हणबर, आदिनाथ मगदूम, परशराम कोळी, महावीर पाटील, प्रदीप मगदूम आदी सहभागी झाले.

चौकट

पाइपचा पर्याय मलमपट्टी करणारा

पुराचे पाणी रस्त्याखालून पलीकडे जाण्यासाठी तीन ठिकाणी पाइप टाकणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; पण पुराचे प्रचंड पाणी वाहून नेण्यासाठी ही पाइपलाइन पुरेशी नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाइप टाकून तात्पुरता मलमपट्टी म्हणजे वेळ काढण्याचा प्रकार आहे. पाइप टाकण्याने पुराची तीव्रता कमी होणार नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती असल्याचे आंदोलकांनी सांगितले.